Wednesday, August 7, 2024

भन्नाट पावसाळी सफर

 भन्नाट पावसाळी सफर



पेब किल्ला उर्फ विकटगड ट्रेक

दि.04 ऑगस्ट 2024

निसर्गात जायचे तर निसर्गाशी एकरूप होऊन,तेव्हा तिथल्या हिरवाईचा खरा अर्थ उमगतो.आपल्या दैनंदिन जीवनात तर रोजच गाड्यांचे आणि गाण्यांचे आवाज ऐकायला मिळतात,

निसर्गातले विविध आवाज तर ऐकुन बघा! तिथली पाने, फुले,गवत, दव नी आकाशात हरवून तर बघा... हाच विचार घेऊन दर्दी भटके गर्दीपासून दूर एकांतातल्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊन आपले निवांत क्षण सत्कारणी लावताना दिसतात.

आम्ही मात्र ठिकाणच असे निवडले की,जिथे वर्षभर रंगीबेरंगी पर्यटकांचा राबता असतो...ते म्हणजे  माथेरान चे कुशीतील.किल्ले 'पेब' उर्फ 'विकटगड' 

खरेतर हा ट्रेक काही वर्षांपूर्वी च दोनही मार्गाने मी पूर्ण केलेला होता. मागील महिन्यात अचानक माझा सह्याद्री मित्र रोशन शी या ट्रेक विषयी बोलताना या आठवणी जाग्या झाल्या, आणि तसेही मला बऱ्याच दिवसांचे पावसाळी भटकंती चे वेध हे लागलेले च होते पण जुलै मध्ये पंढरपूर सायकल वारी असल्या कारणाने  मला ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार होती.म्हणून एक दिवसाचा ट्रेक ही तेवढाच हटके हवा, म्हणून मग ‘पेब’ किल्ला च करायचा ठरवले आणि त्याचे संपूर्ण नियोजन अखून आमचे  ट्रेक मित्र चंदन सर यांच्या शी चर्चा करून तयारी चालू केली.आणि बघता बघता आमच्या सह्याद्री वेड्यांची संख्या कधी चाळीशी पार झाली कळेलच नाही या वरून आपण निवडलेला ट्रेक हा भन्नाट च होणार याचे थोडक्यात संकेत मिळाले.

आजवर अनेकांनी माथेरान गाठले ते सहल म्हणूनच! यंदा आमचा मनसुबा काही साधासरळ नव्हता. पायथ्याच्या नेरळ गावातून माथेरान ची toy train चा route गाठायचा. इथला पाऊस थंडी लोकप्रिय आहेच, इथले अनेक झरे ओलांडायचे. अनेक ओहळींची खळखळ ऐकायची,जमेल तितक्या धबधब्यांमध्ये भिजायचे. एकीकडे लोक पावसाळी पर्यटनाला जातात,आपण पावसाळी भटकंती अशा आडवाटेने साजरी करायची...

'पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्र्यांप्रमाणे आपलेही पर्यटन कलंकीत, तकलादू असू नये' याची ट्रेकर मंडळी कसोशिने काळजी घेत असतात. खरे तर त्यांना पाऊसच काय,कुठल्याही ऋतुत डोंगर, जंगल, गड-किल्ल्यांच्या सफरींचा आनंद घेता येतो, मग ते भाजून काढणारे उन असो की, गारठवून टाकणारी थंडी, की पाऊस. अर्थात पावसाळ्यात डोंगरकडे निसरडे बनतात, अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरून वाहतात, तेव्हा ट्रेकर्सच्या पावसाळी मोहिमी जरा मोजून मापूनच होतात आम्हीही तेच केले.पेब किल्यावर जाणारी पावसाळ्यातील अतिशय निसरडी वाट म्हणजे आनंदवाडी गावातून पण त्या वाटेवरून न जाता मी माथेरान च्या मार्गाने  पावसाळी भटकंती मोहिम अखली होती. तसं डोंगररांगांचे निरलस निसर्ग सौंदर्य साठविण्यासाठी अनेकांची पावले येथे वळतात, परंतू पर्यटकांचे मोठे ओझे सहन करणाऱ्या माथेरानची आडवाटेची चढाई म्हणजे एक वेगळा अनूभव नक्कीच ठरणार होती.


शनिवार ०३ ऑगस्ट:

रात्री १०-००च्या सुमारास थत्ते मैदात येथे आमचा ५० सह्याद्री भटक्यांचा  चमु नेरळ चे दिशेने निघाला. सगळीकडे पाऊस च पाऊस पण आमच्या नगरी भागातील नेहमी प्रमाणे पावसाचा आरंभ कुर्मगतीचाच. आकाशात ढग तर आहेत, पण ते पावसाचे नाहीतच माळशेज येईपर्यंत वेगवेगळ्या बाकांच्या गप्पा टप्पांचे पावसांच्या अलगत सरींच्या सोबत वेगवेगळे विषय रंगात येऊ लागले होते.त्यात च भर म्हणजे आपल्याकडे गेल्या काही पिढ्यांनी पाऊस आणि चहा हे नातं जपलं आहे, तेव्हा

आम्हालाही ते थोडच चुकतं?आता हि ट्रेकर मंडळी भारी चुझी असतात, चहा कसाही चालेल, ठिकाण हक्काचं हवं. आणि आळेफाटा पार करताच  काही वेळातच आम्हाला आमच्या गप्पा थांबवाव्या लागल्या. त्या थांबवाव्याच लागणार होत्या. अहो! आम्ही महाराष्ट्राचे पावसाळ्यातील भयानक समजला जाणार घाट म्हणजे माळशेज घाटात दाखल होत होतो. इथे पाऊस तुमच्या स्वागताला नेहमीच तयार असतो आणि त्याला जोड म्हणजे इथले ढग नी धुके येथे भेटतातच. धुक्याचे तर माळशेज वर अलोट प्रेम, तेव्हा इथल्या धुक्यातून समोर काहीच दिसत नसताना वरून पावसाळी धबधब्यांचे लोट सहन करत आमच्या भल्या मोठ्या गाडीने आणि सर्वात महत्वाचे ड्रायव्हर चे त्या धुक्यातून मार्ग काढन्याच्या कले  मुळे आम्ही सुखरूप तो घाट पूर्ण केला आता नेरळ पर्यंत तो आपल्याला जन्मोजन्मीचे भिजवून सोडणार', अशा रम्य कल्पना रंगवत आमच्या गाडीने रविवार सकाळी ०६ वाजता नेरळ गाठले.


रविवार ०४ ऑगस्ट

सकाळी ०६ वाजता आम्ही नेरळ ल पोहचलो आणि  नेहमीच आम्हा भटक्यांना हवाहवासा वाटणाऱ्या पावसाने आमचे जोरदार स्वागत गेले मनात विचार आला हा जर दिवसभर असाच बरसत राहिला आणि पूर्ण धुक्यानी गडावर जर चादर पांघरलेली असेल तर एका मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार होते परंतु त्याने नाराज न करता थोड्याच वेळात उसंत घेतली आणि आम्ही गरमागरम उपमा,इडली,मिसळपाव याचा आस्वाद घेऊन लोकल  टॅक्सी ने माथेरान चां रस्ता धरला आणि आम्ही NM 134 दस्तुरी नाका इथे पोहचलो इथून च आमचा ट्रेक चालू होणार होता 

इथे आल्यावर नक्कीच जाणवते की रम्य... सुंदर...शांत: काही झाडावर हिरवे मखमली शेवाळ, तर काहींवर पाने, वेली, फांद्यासकट परजिवी झाडे उगवलेली...एकमेकांच्या आधाराने बहरलेले हे जिवन माणसाला काही बोध देऊ शकते का? 'माझ्या जागेत याने अतिक्रमण केले आणि त्याच्या जागेत मी घुसखोरी केली', असे दैनंदिन जिवनात माणसामाणसातले वाद विकोपाला जातात तेव्हा, परस्पर सहकार्याने केवढे शांततामय नी सुंदर जगता येऊ शकते, यांच्याकडून हा धडा घेता आला तर?या विचारांचे चक्र डोक्यात चालता चालता निसर्गाचे अमिट रूप डोळ्यात साठवत त्या toy ट्रेन चे मार्गावर चालताना पुनः एकदा दूधसागर ट्रेक ची आठवण झाली.पूर्ण रस्त्यावर विलोभनीय धबधब्यांच्या साखळी न्याहरत आम्ही उजव्या हाताला असलेल्या  कमानी  पाशी आलो  इथून पुढे खर तर आमच्या ट्रेक चा कस लागणार होता  पुढे खाली उतरत डाव्या हाताला पाषाणात कोरलेली ५२ फूट मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत होती या मूर्तीचे वैशष्ट्य म्हणजे इथलेच एक गणेश भक्त राजाराम खडे यांच्या संकलपणेतून हि मूर्ती साकार झाली आहे.गणपतीचे दर्शन घेऊन मी लगेच पुढे गेलो कारण पुढचा टप्पा हा पूर्णपणे निसरडा आणि एका बाजूला भली मोठी दरी होती त्या मुळे पूर्व अनुभवानुसार इथे रोप लावा लागणार होता म्हणून तो सोबत च ठेवला तसेही कुठला ट्रेक असूद्या कुठल्याही आपत्ती ल तोंड देण्यासाठी लागणारे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व साहित्य माझ्या पाठीवरील पोटलित समाविष्ट असतेच.

त्यातही पावसाळ्यात या भागातील चंदेरी, पेब, कलावंतिण, प्रबळगड आदी परिसर भटकंतीकरिता नेहमीच आव्हानात्कक. त्यातही डोंगरात चालण्याचा अनूभव, योग्य नेतृत्वाचा अभाव असेल तर मोठी आपत्ती ओढवू शकते.आणि अनुभव किती मोलाचा असतो यालाच अधोरेखित करणारी घटना आमच्या बाबतीत देखील झाली त्या निसरड्या वाटेवरून आमच्याच सौ.पाय घासरून पडल्या केवळ दैव बलवत्तर म्हणून रोप ल तिने घट्ट धरून ठेवल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि केवळ डोळ्याजवळील जखमेवर ते निभावले परंतु आता पुढचा सगळा ट्रेक तिच्या सोबत थांबावे लागणार होते त्या मुळे बाकीच्यांच्या कडे लक्ष देता नाही आले परंतु आमचे सहकारी चंदनसर ,श्रीकांत,उमेश,महावीर,ऋषी,सचिन,कृष्णा,पूजा या सर्वांनी परिस्थितीची जाणीव ठेवून सर्वांचा ट्रेक सुखरूप पूर्ण करून घेतला.पुढील तीनही शिड्या चढून आम्ही सर्व प्रती गिरनार समजल्या जाणाऱ्या उंच टेकडीवरील महादेव मंदिर पाशी पोहचलो. वातावरण आता बऱ्यापैकी स्वच्छ झाले होते त्या मुळे तिथून  गाढेस्वर तलाव,उल्हास नदी तसेच कलावंतीण,प्रबळगड,चंदेरी किल्ले स्पष्ट दिसत होते या किल्ल्याला पूर्वी सात बुरुज होते त्याचे आता फक्त थोडेच अवशेष शिल्लक आहे या किल्ल्याचा इतिहास बघता गडाच्या पायथ्याला असलेल्या पेबी देवी वरून किल्ल्याला पेब नाव पडले असावे तसेच ह्या किल्ल्याचा उपयोग धान्यसाठा ठेवण्यासाठी आणि इथून दिसणाऱ्या वरील किल्यावर नजर ठेवण्यासाठी केलेला असावा असा इतिहास कार सांगतात तसेच  कल्याण बंदरावरून महाराजांनी जो खजिना लुटून आणला होता तो इथेच ठेवण्यात आला असावा असा देखील उल्लेख आढळतो.

गडावर सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि एक छानसा ग्रूप फोटो काढला आमच्या मधील छोटा रुद्र च्या गारद नंतर गड उतार करण्यास सुरवात केली खाली पायथ्याला नेरळ गावी पोहचल्यावर सर्वांनी रुचकर अशा जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही सायंकाळी ०६ वाजता या सुंदर आठवणी सोबत घेऊन परतीच्या प्रवसला लागलो.














गेल्या दहा-पंधरा वर्षात महाराष्ट्रात पावसाळी पर्यटनाचे पेव फुटले आहे, तशा गर्दीची बाधा नसलेल्या वाटेवरची ही भटकंती मनोमन सुखावणारी ठरली. अन्यथा सह्याद्रीत अनेक धबधबे आणि डोंगरकडे लोकांच्या गर्दीने फुलू लागलेत. त्याठिकाणी काय बघायला मिळते, हुल्लडबाजी, नाचगाणे, प्रसंगी दारूकाम, प्लास्टिकचा कचरा. अशा गडबडबाज पर्यटकांच्या आवाजांमुळे निसर्गाची शांतता कुठेच शिल्लक राहत नाही. इतका गडबड गांधळ बघुन कुणाला अशा निसर्गात रमायला आवडेल? माथेरानच्या या कुशीत माथेरान च्या रस्त्यावर थोडाकाळ हाही अनूभव आला, पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे याचे खरा निसर्गी प्रेमी असलेल्या भटक्यांना नेहमीच  पावलोपावली जाणवते.

सचिन भांड पाटील

सह्याद्री ट्रेकर्स परिवार


देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...