Thursday, June 23, 2022

कळसुबाई ट्रेक 2022

 जय महाराष्ट्र मंडळी !        

      महाराष्ट्र दोन गोष्टीसाठी खूप जग प्रसिद्ध आहे एक म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या डोंगर दऱ्यामधील सर्वोच्चउंच शिखर कळसुबाई पावसाळा सुरू झाला आणि या वेड्या मनाला वेध लागले ते ट्रेकिंगचे आणि मित्रांसोबत भटकंती करण्याचे. इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही गिर्यारोहक नवीन वर्षाच्या पहिल्या-वहिल्या ट्रेकिंगचा श्री गणेशा  करायचं ठरवल. तो सह्याद्रि मधील सर्वोच्च शिखर सर करण्याचं आणि ते पण नुकतेच आम्हा भटक्यासाठी सुरू झालेल्या आणि निसर्गाने नटलेल्या रस्त्याने म्हणजेच पांजरे मार्गे करण्याच 

.सर्व नियोजनानुसार 18 जूनच्या रात्री 12 वाजता  कळसूबाईच्या दिशेने डोंगर चढून अद्भुत नजाऱ्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो सुरवातीला फक्त 45 च सदस्य घ्यायचे हाच एकमेव विचार होता. कारण पावसाळी दिवस त्यात निसरडी वाट पण मित्र मंडळी च्या आग्रहास्तव 45 चे 80 कधी झाले ते अगदी गाडी मध्ये बसे पर्यत कळलेच नाही . कळसुबाई ब्लॉग सुरु करण्या आधी थोडी कळसुबाई बद्दल माहिती करून घेऊ. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.तसेच दुसरा जो मार्ग आहे तो नुकताच प्रकाशझोतात आलेला पांजरे मार्गे ह्या रस्ताने जायचे झाल्यास एखाद्या ग्रुप सोबत च जावे शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची असंख्य  अख्याइका सांगितली जाते त्यातील एक प्रचलित म्हणजे, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले होते. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.हा ट्रेक आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी केलाय तो बारी मार्गे ह्या मार्गे ट्रेक करणे म्हणजे तितकासा अवघड नाही फक्त खडी चढाई असल्याने दमछाक होणारा तर नक्कीच अन दुसरा म्हणजे खडी चढाई जरी नसलेला पण आपण सर्वोच्च शिखर सर केलंय याचा आनंद देणारा आहे हे निश्चितच जेंव्हा आपण ट्रेक पूर्ण करून खाली येतो तेव्हा जाणवते.                

          असा हा ट्रेक करण्याचे ठरवले आणि आमच्या दोन्ही गाड्या नियोजित वेळेनुसार निघाल्या काळोखी रात्र अन पावसाळी थंडगार वारा त्या मुळे सर्वच गाडी मध्ये झोपी गेले ते इतके की पहाटे कोवळ्या प्रकाशात त्यांचे जेव्हा डोळे उघडले ते स्वर्गसुख घेण्यासाठी अन आपल्या मोबाईल मध्ये ते सौंदर्य टिपण्यासाठी च आणि त्या नंतर लगेचच आम्ही फ्रेश होण्यासाठी आमचा सह्याद्रि मधील सवंगडी नामदेव च्या घरी पोहोचलो तिथे चहा नास्ता करुन आम्ही एकमेकांशी थोडक्यात ओळख करून घेतली आणि ट्रेक दरम्यान काय काळजी घ्यायची याची सुचना देण्यात आली. आत या ठिकाणी काही गोष्टी आवर्जुन सांगाव्याशा वाटतात की जेंव्हा ट्रेक लीडर काही सूचना देतात त्या तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत कारण त्या मागे त्यांचे अनुभव कामाला आलेले असतात तसेच काहीसे अनुभव आम्हाला ह्या ट्रेक दरम्यान आले .कारण प्रत्येक ग्रुप मध्ये भरपूर अंतर जाणवत होते .त्याच प्रमाणे जेव्हा असे अंतर पडते तेव्हा आपण मागील ग्रुप येवोस्तोवर थांबणे अपेक्षित असते त्याच प्रमाणे जेव्हा समोर दोन रस्ते दिसतात अन आपण खात्रीपूर्वक रस्ता नाही सांगू शकत तोपर्यत मागील अनुभवी गिर्यारोहक येउस्तवर तिथेच थांबावे लागते .असो अशा बऱ्याच गोष्टीचे नियमात पालन आपण आपल्या पुढील ट्रेक दरम्यान कराल  याची मला खात्री आहे.असा हा ट्रेक आम्ही सहा ला सुरू करणे अपेक्षित होते पण सदस्य संख्या वाढल्याने सर्वांचे आवरताना ट्रेक चालू करण्यासाठी 8 वाजले आणि आमचा ट्रेक चालू झाला शिखराच्या मध्यानापर्यत येवोस्तोवर अलगत ढगांची चादर केव्हा ओढली ते कळले च नाही तो जो अनुभव होता तो ग्रुप मधील जवळपास सर्वच जण घेत होते त्यातच जोरदार हवा आणि पाऊस सुरू झालेला  अशा परिस्थिती देखील सर्वांनीच कळसुबाई शिखर गाठले आणि आता खाली उतरताना खरी कसोटी लागणार होती पण सर्वांनी अगदी एकमेकांच्या मदतीने गड उतार केला त्यात ज्ञात असलेल्या पैकी अमित ने तर मधल्या फळीत ज्या चिकट वृत्तीने batting करावी त्याच पद्धतीने आमच्या शेवटचा ओव्हर ला काही विशेष न ठेवता सामना एक हाती जिंकून दिला त्या बद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.त्या सोबतच नेहमी प्रमाणे किरण आणि बाकी मंडळी असल्या मुळे लहान मुलांची मला कधीच काळजी वाटत नाही त्या प्रमाणे लहान मुलांना ज्या प्रमाणे सांभाळले आणि सुखरूप पायथ्याला आणले त्या बद्दल देखिल आम्हा पालकांच्या वतीने त्याचे आभार त्या सोबतच शिंदे सर असतिल लिलाचंद, गुप्ता जी, दोन्ही डॉक्टर असतील असा सर्वच ग्रुप मेंबर्स ने सर्वांना सुखरूप पायथ्यापर्यत पोहचवले त्या सर्वांचे मी परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच ह्या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सहा वर्षांच्या मुलापासून वयाच्या 70 री पार केलेल्या सदस्यांनी हा ट्रेक पूर्ण केला त्या सर्वांचेच अभिनंदन.

 ट्रेकिंग करण ही केवळ एक दोघांची जबादारी नसते त्या साठी सर्वांचे च हात कामाला येतात तेच ह्या ट्रेक दरम्यान सर्वांनी अनुभवलं सर्वांचे पुनश्च: आभार .प्रत्येक ट्रेक हा आपल्याला काही न काही शिकवत असतो त्यातील च हा ट्रेक भरपूर काही शिकवून गेला आणि असेच आपल्या परिवाराचे पुढील ट्रेक देखील आनंदी अविस्मरणीय राहतील याची मी ग्वाही देतो.                

     सचिन भांड                            

     सह्याद्रि ट्रेकर्स परिवार                     

     श्रीरामपूर  .                               

sahyadritrekers.blogspot.com

      

Wednesday, June 1, 2022

काजवा मोहत्सव 2022

  सहयाद्री ट्रेकर्स आयोजित,
काजवा मोहोत्सव 2022

वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवर, दगड धोंड्यांवर, पाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्‍यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्येक घटकाला माहीत असत रात्री नंतर दिवस उजाडणारच आहे, फक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणार, त्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साह, आनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो. निसर्गातला जिवंतपणा, पक्षांच्या किलबिलाटासहित त्याच्या स्वछंदी बागडण्यातून सर्वत्र मोकळा आनंदी, ऊत्स्फूर्त जिवंतपणा भरून टाकणार असतो. निसर्गाला या येणार्‍या सृष्टीतल्या बदलाची जाणीव होते. त्यातील प्रत्येक घटक येणार्‍या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपआपल्या परीने त्याच्या स्वागताची तयारी करत असतो. असाच एक चमत्कार सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, रानावनात घडत असतो. ज्यावेळी आपण निद्राधीन असतो त्याचवेळी नभोमंडल जमीनीवर पानाफुलांमध्ये अवतरलेल असत. वैशाख महिन्याच्या शेवटाला रात्रीच्या अंधारात काजव्यांचा थरार सुरू होतो. जंगलात दमटजागी, पाण्याच्या जवळपास हजारो, लाखो किंवा कोट्यवधी काजवे जमा होतात.लहानपणी शेतामध्ये काजव्यांचा मागून धावताना कित्तेक तास घालवलेत. तेव्हा एकटेदुकटे दिसणारे काजवे एखाद्या पारदर्शक डब्यात पकडून गोळाकरायचे,  किती वेळा आणि किती वर्ष हा खेळलो असेल आता आठवत नाही. लहानपणी जेव्हढे काजवे दिसायचे तेव्हढेही काजवे आता गावी दिसत नाहीत याची खंत असायची मनात. सहा वर्षापूर्वी रात्री असच कळसुबाई चढताना अचानक मला शोध लागला  भंडारदर्‍याच्या काजवा मोहोत्सवाचा. तेव्हापासून प्रत्येक वर्षी हा काजवा मोहोत्सव पहाण्यासाठी भंडारदर्‍याला जाणे होते.  वैशाखसरताना भंडारदर्‍याच्या हवेतच बदल होत नाही तर निसर्गही कात टाकतो. चोहोबाजूंना मिट्टकाळोख पसरलेला असतो आणि काजव्यांच्या प्रकाश शलाखा रस्त्यावरून, झाडांवरून खाली दरीतून डोंगरावरून लुकलुकत असतात. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागात अजूनही निसर्ग त्याच्या मूळ रूपात शाबूत आहे. ग्रीष्माच्या शेवटी आणि पावसाच्या सुरूवातीला इथल्या डोंगरदर्‍यांमद्धे काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. रस्त्याच्या दुतर्फा काही विशीष्ठ झाडांवरच काजव्यांचा लयबद्ध चमचमाट चालू असतो. ही काजव्यांची वाढती संख्या येणार्‍या पावसाची वर्दी देतात. त्यांच्या संखेवरून निसर्गत:च येणार्‍या पावसाच्या तीव्रतेची कल्पनाही करता येते. वातावरणातील दमटपणा आणि आद्रता जशी जशी वाढत जाते तशी तशी काजव्यांची संख्या वाढत जाते. जणूकाही सर्व नभोमंडळ जमीनीवर अवतीर्ण झाल्याचा स्वर्गीय अनुभव येतो.गाडीचे दिवे बंद करून फक्त यारस्त्यांवर मनसोक्त भटकायचे. या अग्निशिखा कधी तुमच्या डोक्यावरुन तर कधी आजुबाजुने स्वछंदपणे बागडत असतात. भान हरपून तुम्ही रात्रभर नुसते निशब्द फिरत असता आणी मनमुराद ही जमीनीवरची लोभसवाणी प्रकाशफुलं वेचत असता. हा अनुभव खरच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा स्वर्गीय आनंद प्रत्येकाने घ्यायलाच हवा. एकालयीत, तालासूरात निशब्द लुकलुकाट तुमच्या चोहोबाजूला चाललेला असतो, आपण त्याचे मुक साक्षीदार बनलेले असतो. गाडीचे दिवे उघडझाप करून पहा, हे काजव्यांचे दिवेही दिव्याच्या उघडझापीला त्यांच्या चमचमाटाने उत्तर देतात आणि तोही एका तालासुरात, फक्त तुम्हाला तो ताल-सुर कानाऐवजी तुमच्या नजरेने टिपता यायला हवा.अंधार्‍या रात्री गाडीचे दिवे बंद करून ऐकटेच या झगमगीत रस्त्यावरून रॉयल सफर करून बघा, तुम्ही कुणी स्पेशल असल्याचा अनुभव नक्कीच येणार. दुतर्फा नैसर्गिक दिव्यांचा झगमगाट आणी मधून आपली सवारी चालली आहे. एखाद्या परी कथेतील वर्णन ना!.. पण हे काजवे कॅमेर्‍यात बंदिस्त करणे हे महा कर्म कठीण काम. काजवा हा "आरथ्रोपोडी" समुदायातला कीटक आहे. सुमारे दोनशेच्या वरती जाती आहेत काजवयांच्या. प्रत्येकाचे रंग रूप वेगळे, प्रत्त्येकाच्या प्रकाशात फरक, कुणाचा कमी, तर कुणाचा जास्त. परंतु रंगात फरक जरी असला तरी हिरवट-पिवळसर प्रकाशाच्या छटाच तयार करतात हे काजवे. हा दमट वाटवरणात राहणारा जीव आहे, त्याची साधारण लांबी एक ते दीड सेंटीमेटर असते. काजव्यांच्या जीवनक्रम आणि फुलपाखराचा जीवनक्रम सारखाच, फक्त काजवे हे किटकभक्षी आहेत. आधी अंडी, मग त्यातून अळया बाहेर येतात आणी मग उडणारा झगमगणारा कीटक तयार होतो. काजव्यांच्या शरीरात मागील पोटाखालच्या भागात पारदर्शी आवरण असते, त्याला क्युटिकल म्हणतात. यातच प्रकाश देणारा घटक असतो. काजव्यांच्या प्रकाश देणार्‍या अवयवामध्ये / पेशींमध्ये "ल्युसिफेरीन" नावाचा घटक असतो. तोच त्यांच्या चमचमटाला कारणीभूत असतो. काजवयांचा प्रकाश हा थंड, शांत असतो. अंधार्‍यारात्री काजव्यांचे लुकलुकणे फारच मनमोहक दिसते. हे लुकलुकणे काजवयांच्या श्वासोछवासावर अवलंबून असते. जेव्हा कीटक श्वास सोडतो तेव्हा हा प्रकाश मंदावतो, पुन्हा श्वास घेताना प्रकाश प्रखर होतो. नर काजवा मादीपेक्षा थोडा प्रखर प्रकाश देतो, म्हणूनच मादी नराकडे आकृष्ट होते.त्यातून हे कीटक अंडी घालतात अन ती अंडी पाला पाचोळ्यात वर्षभर अळीच्या स्वरूपात राहतात आणि ह्या मौसम मध्ये त्यांच्या प्रजनांनातर त्यांचा कार्यकाळ संपतो.अशा ह्या मोहत्सवाची खरी सुरवात जी झाली ती पुरुषवाडी ह्या गावापासून पण थोडेसे आपिरिचित अन दळणवळणा चा अभाव त्या मुळे हा परिसर तसा पर्यटनाच्या दृष्टीने मागे पडला आणि पुढे आला भंडारदरा म्हणूनच ह्या वर्षी गेले दोन वर्षे करोनाच्या साथीने हा परिसर पर्यटनासाठी बंद असल्या कारणाने ह्या वर्षी काजवा महोत्सव पुरुषवाडी ला घेण्याचे ठरवले सुरवातीला दोन batch मध्ये म्हणजेच मे चा शेवटचा आठवडा आणि जून चा पहिला आठवडा अस नियोजन होत पण काही सदस्यांच्या सोयी मुळे मे मधेच दोन्ही batch घेण्याचे ठरले आणि पहिल्या batch ला पाहिजे तसे काजवे पाहण्यास नाही मिळाले म्हणून ती एक मनात खंत होतीच म्हणूनच दुसरी batch अगदी तीन दिवस अगोदर पर्यत पुरुषवाडी मध्ये कुठलीच कजव्यांची हालचाल न दिसल्याने ठिकाण बदलावं लागले आणि घाटघर च नियोजन केले परंतु तिथे होणारी शनिवार रविवार ची गर्दी पाहता रविवार आणि सोमवार च नियोजन ठरलं आणि तो निर्णय खरोखरच जेव्हा सदस्यांच्या डोळ्यांचे पारणे फीटताना दिसले तेव्हा मनाला एक आत्मिक समाधान झाले .असा ह्या प्रवासाचे वर्णन करावयाचे झाल्यास नेहमी प्रमाणे आमची 8 वाजता निघणारी बस 9 वाजता तिने प्रस्थान केले.गाडीने थोडे अंतर पार केल्या नंतर ग्रुप मध्ये बरीचशी मंडळी ही नवीन होती त्यामुळे त्यांची ओळख त्यांनी करून देताना एका वेगळ्या स्वरूपात करून देताना गाडीने रस्ता केव्हा पार केला ते कळलेच नाही त्यात रस्त्यात एका कार्यालयात जेवणासाठी थांबताना त्यांनी ज्या पद्धतीने आदरातिथ्य केले ते कधी विसरुचशकत नाही आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला तिथे पोहचल्यावर आमच्या घाटघर च्या भावाच्या हातून सर्व सदस्यांचे आपल्या पारंपरिक प्रथे प्रमाणे ग्रुप च्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.
नंतर चहाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्व धरणाच्या पाठीमागे जाऊन सर्वांनीच फोटोसेशन चा मनमुराद आनंद घेतला.
त्याच प्रमाणे सध्या आपण डोंगर दऱ्या फिरताना ओसाड झालेली रानमळे बघतो त्यांचे हे वैभव पुनः उभे करण्यासाठी आपल्या परीने जाऊ तिथे वृक्षारोपण ही संकल्पना ह्या वर्षी पासून आम्ही  चालू केली त्या नुसार वृक्षारोपण चा कार्यक्रम घेतला अन  जस जसा अंधार पडू लागला तस तशी
सर्वजण खूप खुश होत होते, सर्वाना काजवे कसे पाहावे काय काळजी घ्यावी या विषयी थोडे मार्गदर्शन करून आम्ही सर्वजण सृष्टीचा अनमोल नजरा बघण्यासाठी मार्गस्थ झालो काहीजण तर काजवे बघण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेत होते, लहान मुले पण त्यांना पकण्यासाठी त्याच्या मागे पळत होते थोड्यावेळाने एक काजवा एक जणांच्या हातावर येऊन बसला मग तो काही लहान मुलाच्या हातावर देऊन त्यांना काजवा त्याच्या हातावर पकडण्याचा अनुभव घेता आला, अर्थात ह्यात काजव्याची सुरक्षितता सांभाळली, आणि सर्वांना तो इवल्याशा जीवाला किती काळजीपूर्वक हाताळायला हवे हे सांगितले, लहान मुलांनी सुद्धा मग, अगदी प्रेमाने काजवा त्यांच्या हातावर चालताना त्याला इजा होणार नाही ह्याची काळजी घेतली.  ती खूप खुश होती सारखी कजव्याच्या मागे पळत होती, त्यांना काळोखात दुसरी कसलीच भीती वाटत नव्हती.  ती बिनधास्त पणे आनंद लुटत होती, त्याच्या पालकांना भीती वाटत होती, की काळोखाय पायाखाली एखादा, सरपटणार जीव येईल पण मुले बिनधास्त होती.खरच निसर्गाची काय किमया आहे ना, ना कोणती इलेक्ट्रिसिटी , ना कोणते लाईट कनेक्शन तरीही हे काजवे लुकलुकत होते, किती अवर्णनीय क्षण होते ते, अगदी दिवाळीत रोषणाई करतो तशी सर्व झाडे शृंगार केल्यासारखी लुकलुकत होती, त्या लुकलूकण्यामुळे त्या काळोखात त्याचे सौन्दर्य अगदी फुलून दिसत होते,  आम्हा सर्वांसाठी असे हजारो काजवे आसपास बघणे ही एक वेगळीच अनुभूती होती आणि हे सर्व क्षण डोळ्यात साठवून आम्ही जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.
आणि त्या नंतर कुणाच्या मोबाईल ला range नसल्यामुळे बिना म्युझिक चा सर्वांनीच गाण्याचा अनुभव घेतला आणि सर्वजण आपापल्या तंबू मध्ये जाऊन झोपली आणि सकाळची जी सुरवात झाली ती एक दुःखद घटना कळल्या मुळे ग्रुप मधील मंडन काका यांचे थोरले बंधु यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्या मुळे सर्वांनीच परिस्थिती चे भान ठेवून लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करून श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो.
काजव्यांचा  हा अविस्मरणीय अनुभव प्रत्येकानेच एकदा तरी अनुभवावा.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपूर.

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...