Wednesday, January 22, 2025

एक थरारक अनुभव

 



भैरवगड (मोरोशी )

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: माळशेज

जिल्हा : ठाणे

श्रेणी : अत्यंत कठीण 

          " सह्याद्री" हे नावं ऐकल्यावर डोळ्यासमोर उभे ठाकतात प्रचंड बेलाग कडे ,डोंगरवाटा , अफाट असे दुर्गम किल्ले व निसर्गाची कलाकुसर . या सह्याद्रीने त्याच्या पोटात अजाण काळातल्या इतिहासाच्या पाऊलखुणा ,जैवविविधता अजूनही राखून ठेवल्या आहेत . .अशी हि निसर्गसंपत्ती टिकवण्यासाठी मोठमोठे डोंगर ,दऱ्या ,नदीनाले याची शृंखला या सह्यगिरीने उभारली आहे . सह्याद्रीला जवळून ओळखायचे असेल तर त्याच्या अंगा खांद्यावर भटकायला लागतं मित्रा !!!! 

अश्या भन्नाट रानवाटा तुडवण्यासाठी " सह्याद्री पारिवार " या संस्थेने बऱ्याच भटक्यांना गेली चार वर्षात सह्याद्री मध्ये खूप भटकायला भाग पाडलं . त्यात कित्येक साहसी मोहिमा देखील सुरक्षित पार पडल्या.

गेल्या काही वर्षापासून माझी सरत्या वर्षाला निरोप देताना कुणी सोबत असो वा नसो एखाद्या दुर्लक्षित भन्नाट ट्रेक ने वर्षाची सांगता होत असते तशीच सांगता या 31 डिसेंबर ला दुर्गम अशा औंढा किल्यानी झाली तसेच नवीन वर्षाची सुरवात सुद्धा आमच्या परिवाराची सह्याद्री मधील अतिशय खडतर कठीण श्रेणी तील ट्रेक ने होत असते या आधी देखील परिवाराने अलंग मदन कुलंग दोनदा लिंगाणा एकदा सर्व सदस्यांनी सुरक्षित आणि यशस्वी करून दाखवला.परिवाराची या वर्ष्याची भटकंतीची सुरुवात मोरोशी चे भैरवगड ने करायचे हे आधीच ठरवले होते भैरवगड या आधी केलेला असल्या मुळे त्याची दाहकता किती आहे हे माहित होतेच अहो हा किल्ला कुठला ही तर् सरळ अंगावर येईल अशी भली मोठी भिंत.

नवीन वर्षाची सुरवात आपण भैरवगड ने करतोय असा msg जेव्हा ग्रुप वर टाकला त्या नंतर " मनाने "केव्हाच माळशेज भैरवगड च्या जंगलात भटकायला सुरुवात केली . 

सुरवातीला काही मोजकेच आम्ही 28 मंडळी तयार झालो पण जसं जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तस तसे आमचा एक एक मावला गळत होता. आणि शेवटी 12 धाडसी मावळ्यांना घेऊन आम्ही भैरवगड कडे कूच केली.हजार फुट लांब, काही हजार फूट रुंद, डीद दोन हजार फूट उंच दिसणार एक लोभसवाणा डोंगर!!!! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं कि चक्करयावी इतकी खोली, सकाळी ११ वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगराचा शेजार!!त्यच्या एका बाजूला सरालकोट भिंत आणि दुसर्या बाजूला कोरलेली वेडी वाकडी कातळ 

- - - भैरवगड या वर्णनापेक्षाहीं अधिक काहीतरी!!!!!!!

सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक"; ही रचना आपल्याला भैरवगडावरती पहायला मिळते. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्टप्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डाईकवर (बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर) बनवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो.

माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. पायर्‍या उध्वस्त केलेल्या आहेत. या ठिकाणी दोर लाऊनच वर चढावे लागते.हा साधारणत: १५० फूटाचा भाग (पॅच) पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांच्या एका बाजूला कातळकडा व दुसर्‍या बाजूला खोल दरी आहे तसेच पायर्‍यांवर मुरूमाची माती साठलेली असल्यामुळे जपूनच जावे लागते.पायर्‍या संपल्यावर आपण एका छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला कड्याला लागून एक सुकलेल टाक आहे. ते पाहून डाव्या बाजूच्या वाटेने वर चढायला लागावे ,वाटेत अजून एक कोरडे पडलेले पाण्याचं टाकं लागत. या टाक्याच्या पुढे वाट निवडूंगाच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते. गडमाथा अरूंद असून पूर्व - पश्चिम पसरलेला आहे. गडमाथ्यावर कोणतेही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक ते पूर्वेला हरीश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो.

पहाटे साधारण 3 च्या दरम्यान आम्ही मोरोशीच्या रस्त्याच्या लगतच्या हॉटेल उतरलो. सुनसान रस्ता उगवतीकडे काळोखात अस्पट दिसणारी भैरवगाडाची रांग.पहाटे सकाळी आम्हाला 5 वाजता निघायचे होते त्या मुळे सर्वांनी च थोडीफार वामकुक्षी घेतली पन ट्रेक म्हटलं तर् आपल्याला झोप कुठली जो पर्यंत सुखरूप ट्रेक करून गाडीत बसत नाही तो पर्यंत झोप हि माहित च नाही. सर्व जण आवरता आणि आमचे सुरक्षित तेचे साहित्य पाठीवर लटकावून ट्रेक ल निघायला आम्ही 06 वाजता भैरवगडाच्या दिशेन वाटचाल सुरु केली, गणपती बाप्पा मोरया आणि जय शिवाजी बोलून, भैरवगडच्या खिंडीत पोहचायला किमान 2 तास नुसताच चालायचं होत, चालत चालत थोडे फार फोटो काढले, आणि तसाही फोटो काढून घेतले नाय तर आठवणी कशा राहतील असो, चालता चालता जो भेटेल त्यांच्याशी गप्पा टप्पा मारत नव नवीन मित्र बनवत आम्ही रस्ता काटत होतो , हळू हळू आकाश उजळायला लागल आणि अचानक भयानक असा सुसाट्याच्या वाऱ्याचा तिथे वावर सुरु झाला पुढे जाणे तर् सोडा एका जागेवर सुद्धा तो उभे राहू देत नव्हता म्हणून आम्ही थोडावेळ तिथेच जागेवर बसून घेतले कारण शेजारी भली मोठी दरी तिथे बसल्या बसल्या सगळा परीसर आम्ही बघून घेतला, ती जागा निसंशय सुंदर होती, आमच्या समोरच भैरवगडाची उभी कातळ होती आणि हळूच त्यातून सूर्य बाहेर येण्यासाठी सज्ज होत होता. आजूबाजूला नुसती डोंगर रांग होती, ब्रेक संपला आणि सगळे निघालो.

गडाचा रस्ता काही काही ठिकाणी कठीण होत होता तस तसा तो आम्हाला गडावर नेत होता .एका काहीसा रॉक पॅच वर सुसाटच्या वाऱ्या मुळे अक्षराशः आम्ही हात पाय दोन्ही टेकवत वर चढलो तिथं विश्रांती जास्तीत जास्त ५- ७ min घेऊन परत वर जायला निघालो ते थेट थांबलो ते भैरव गडाच्या भिंतीच्या पायथ्याशीच.

इथून गडाचा माथा पाहताना डोक्यावरील टोपी पडेल असा तो सरळ वर दिसत होता तिथपर्यंत जायला आता आम्ही रोप आणि उध्वस्त पायऱ्यानचा आधार घेत भैरावगाडाचा माथाच गाठला. गडाच्या माथ्यावर अस्ताव्यस्त पसरलेलं निवडूग त्याचे तोचणारे काटे टाळत प्रसंगी रांगत, घसरत चढून सगळे उपद्व्याप करून जेव्हा गडावर पोचलो तेव्हा आमच्या स्वागतासाठी आजूबाजूचा नितांत पसरलेला सुंदर नजारा अफाट पसरलेला पारिसर व्यक्तकरण्या पलीकडे दिसत होता. गडावर बाकी काही नाही, दरवाजा नाही, निवासी बांधकाम नाही, तटबंधी नाही. तिथून आम्ही अर्ध्या तासातच परत फिरलो कारण उन्हान आणि वेळेत पोहचण्याच्या उद्देशाने सगळे पाळायचं बघत होते. मानात विचार आला, आता उतरताना तरं आणखी अवघड प्रकार असणार कारण कडा, कातळ, घळी, खाई सगळ डोळ्या समोर असणार. पायऱ्या वर उतरणाऱ्यांची गर्दी असल्यामुळे थोडे फार बसत उठत आम्ही rappeling चे पॅच पाशी आलो. आमच्या पैकी जवळपास सर्वांनाच rappeling च अनुभव असल्यामुळे पटापट सर्व खिंडीत पोहचलो.तिथे थोडंफार थांबून energy drink घेऊन गड उतार करू लागलो जसं जसे पुढे जात होतो तस तसे हळू हळू भैरवगड मागे पडत होता. आता सर्वांच्या पोटात कावळे कोकायला लागले होते आमच्याकडे non veg प्रेमी जास्त असल्यामुळे सर्वांनी non veg ची फर्माईश केली आता समोर खालच्या दिशेने जाणारी वाट दिसत होती. परिसस्तिती अवघड वैगेरे अजिबात नव्हती.त्यातच रस्त्यात एक अतिशय दुर्दैवी घटना नजरेश पडली माझ्या आज पर्यंत च आयुष्यात कधीच अशी घटना मी बघितली नाही ती म्हणजे एका दुसऱ्या ग्रुप च माणूस बेशुद्ध अवस्थेत दिसला बेशुद्ध कसला अहो त्याचा त्या ठिकाणी पूर्ण श्वास च बंद झालेला होता ग्रुप लीडर किती महत्वाचा असतो हे ते त्या ठिकाणी कळले त्यांचे ग्रुप लीडर म्हणजे अर्ध्या हळकुंडणे पिवळे झालेले नवशिखे ट्रेकर त्यांच्या कडून माहिती घेता कळले त्याला अर्धा तास झाला ते असं पडले त्यांनी त्याला cpr दिला असे सांगण्यात आले आता त्यांनी तो कसा दिला असेल हे सांगणे म्हणजे अवघड च मी त्याचे pulse चेक केले ते कुठेच लागत नव्हते त्यांच्या लीडर कडून तो इसम बेशुद्ध पडण्या अगोदर जे symptoms सांगितले त्या वरून त्याला हार्ट अटॅक आलेला असावा तेव्हड्यात आमच्या मागून आमचा गाईड दीपक विशे आला हा माणूस म्हणजे या भागातील देवदूत या भागातील जेवढे rescue होतात ते या पठ्याकडून च शेवटी आम्ही rope च streture तयार करून खाली घेऊन नेण्याचा निर्णय घेतला तो पर्यंत आम्ही ऍम्ब्युलन्स ल फोन करून पायथ्याला बोलावून घेतली.एव्हाना आमची काही मंडळी हि खाली पोहचली होती आम्ही देखिल त्यांच्या मागून पायथ्याला पोहचलो आणि जेवणाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

या ट्रेक मुळे भरपूर काही शिकायला मिळाले.मोरोशीचा भैरवगड हा एक अत्यंत कठीण श्रेणीतील ट्रेक असून यात ट्रेक बरोबर गिर्यारोहण ही करावं लागतं. सहसा कोणीही एका-दोघांनी, गिर्यारोहणाच्या साहित्या शिवाय प्रयत्नही करू नये असाच. पण एखाद्या अनुभवी ग्रुप बरोबर एकदा तरी भेट द्यावी असा सह्याद्रीचा एक रांगडा गडी आहे.

या मोहिमेत सहभागी झालेले श्रीकांत, अभिमन्यु जी ,निर्मळ सर, भूषण, साजेब,मखेजा, सागर, केशव,गुलाटी जी, बत्रा जी,शिवाजी सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन🙏


*सचिन भांड*

*सह्याद्री ट्रेकर्स परिवार, श्रीरामपूर*

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...