Thursday, June 23, 2022

कळसुबाई ट्रेक 2022

 जय महाराष्ट्र मंडळी !        

      महाराष्ट्र दोन गोष्टीसाठी खूप जग प्रसिद्ध आहे एक म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या डोंगर दऱ्यामधील सर्वोच्चउंच शिखर कळसुबाई पावसाळा सुरू झाला आणि या वेड्या मनाला वेध लागले ते ट्रेकिंगचे आणि मित्रांसोबत भटकंती करण्याचे. इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही गिर्यारोहक नवीन वर्षाच्या पहिल्या-वहिल्या ट्रेकिंगचा श्री गणेशा  करायचं ठरवल. तो सह्याद्रि मधील सर्वोच्च शिखर सर करण्याचं आणि ते पण नुकतेच आम्हा भटक्यासाठी सुरू झालेल्या आणि निसर्गाने नटलेल्या रस्त्याने म्हणजेच पांजरे मार्गे करण्याच 

.सर्व नियोजनानुसार 18 जूनच्या रात्री 12 वाजता  कळसूबाईच्या दिशेने डोंगर चढून अद्भुत नजाऱ्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो सुरवातीला फक्त 45 च सदस्य घ्यायचे हाच एकमेव विचार होता. कारण पावसाळी दिवस त्यात निसरडी वाट पण मित्र मंडळी च्या आग्रहास्तव 45 चे 80 कधी झाले ते अगदी गाडी मध्ये बसे पर्यत कळलेच नाही . कळसुबाई ब्लॉग सुरु करण्या आधी थोडी कळसुबाई बद्दल माहिती करून घेऊ. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.तसेच दुसरा जो मार्ग आहे तो नुकताच प्रकाशझोतात आलेला पांजरे मार्गे ह्या रस्ताने जायचे झाल्यास एखाद्या ग्रुप सोबत च जावे शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची असंख्य  अख्याइका सांगितली जाते त्यातील एक प्रचलित म्हणजे, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले होते. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.हा ट्रेक आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी केलाय तो बारी मार्गे ह्या मार्गे ट्रेक करणे म्हणजे तितकासा अवघड नाही फक्त खडी चढाई असल्याने दमछाक होणारा तर नक्कीच अन दुसरा म्हणजे खडी चढाई जरी नसलेला पण आपण सर्वोच्च शिखर सर केलंय याचा आनंद देणारा आहे हे निश्चितच जेंव्हा आपण ट्रेक पूर्ण करून खाली येतो तेव्हा जाणवते.                

          असा हा ट्रेक करण्याचे ठरवले आणि आमच्या दोन्ही गाड्या नियोजित वेळेनुसार निघाल्या काळोखी रात्र अन पावसाळी थंडगार वारा त्या मुळे सर्वच गाडी मध्ये झोपी गेले ते इतके की पहाटे कोवळ्या प्रकाशात त्यांचे जेव्हा डोळे उघडले ते स्वर्गसुख घेण्यासाठी अन आपल्या मोबाईल मध्ये ते सौंदर्य टिपण्यासाठी च आणि त्या नंतर लगेचच आम्ही फ्रेश होण्यासाठी आमचा सह्याद्रि मधील सवंगडी नामदेव च्या घरी पोहोचलो तिथे चहा नास्ता करुन आम्ही एकमेकांशी थोडक्यात ओळख करून घेतली आणि ट्रेक दरम्यान काय काळजी घ्यायची याची सुचना देण्यात आली. आत या ठिकाणी काही गोष्टी आवर्जुन सांगाव्याशा वाटतात की जेंव्हा ट्रेक लीडर काही सूचना देतात त्या तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत कारण त्या मागे त्यांचे अनुभव कामाला आलेले असतात तसेच काहीसे अनुभव आम्हाला ह्या ट्रेक दरम्यान आले .कारण प्रत्येक ग्रुप मध्ये भरपूर अंतर जाणवत होते .त्याच प्रमाणे जेव्हा असे अंतर पडते तेव्हा आपण मागील ग्रुप येवोस्तोवर थांबणे अपेक्षित असते त्याच प्रमाणे जेव्हा समोर दोन रस्ते दिसतात अन आपण खात्रीपूर्वक रस्ता नाही सांगू शकत तोपर्यत मागील अनुभवी गिर्यारोहक येउस्तवर तिथेच थांबावे लागते .असो अशा बऱ्याच गोष्टीचे नियमात पालन आपण आपल्या पुढील ट्रेक दरम्यान कराल  याची मला खात्री आहे.असा हा ट्रेक आम्ही सहा ला सुरू करणे अपेक्षित होते पण सदस्य संख्या वाढल्याने सर्वांचे आवरताना ट्रेक चालू करण्यासाठी 8 वाजले आणि आमचा ट्रेक चालू झाला शिखराच्या मध्यानापर्यत येवोस्तोवर अलगत ढगांची चादर केव्हा ओढली ते कळले च नाही तो जो अनुभव होता तो ग्रुप मधील जवळपास सर्वच जण घेत होते त्यातच जोरदार हवा आणि पाऊस सुरू झालेला  अशा परिस्थिती देखील सर्वांनीच कळसुबाई शिखर गाठले आणि आता खाली उतरताना खरी कसोटी लागणार होती पण सर्वांनी अगदी एकमेकांच्या मदतीने गड उतार केला त्यात ज्ञात असलेल्या पैकी अमित ने तर मधल्या फळीत ज्या चिकट वृत्तीने batting करावी त्याच पद्धतीने आमच्या शेवटचा ओव्हर ला काही विशेष न ठेवता सामना एक हाती जिंकून दिला त्या बद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.त्या सोबतच नेहमी प्रमाणे किरण आणि बाकी मंडळी असल्या मुळे लहान मुलांची मला कधीच काळजी वाटत नाही त्या प्रमाणे लहान मुलांना ज्या प्रमाणे सांभाळले आणि सुखरूप पायथ्याला आणले त्या बद्दल देखिल आम्हा पालकांच्या वतीने त्याचे आभार त्या सोबतच शिंदे सर असतिल लिलाचंद, गुप्ता जी, दोन्ही डॉक्टर असतील असा सर्वच ग्रुप मेंबर्स ने सर्वांना सुखरूप पायथ्यापर्यत पोहचवले त्या सर्वांचे मी परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच ह्या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सहा वर्षांच्या मुलापासून वयाच्या 70 री पार केलेल्या सदस्यांनी हा ट्रेक पूर्ण केला त्या सर्वांचेच अभिनंदन.

 ट्रेकिंग करण ही केवळ एक दोघांची जबादारी नसते त्या साठी सर्वांचे च हात कामाला येतात तेच ह्या ट्रेक दरम्यान सर्वांनी अनुभवलं सर्वांचे पुनश्च: आभार .प्रत्येक ट्रेक हा आपल्याला काही न काही शिकवत असतो त्यातील च हा ट्रेक भरपूर काही शिकवून गेला आणि असेच आपल्या परिवाराचे पुढील ट्रेक देखील आनंदी अविस्मरणीय राहतील याची मी ग्वाही देतो.                

     सचिन भांड                            

     सह्याद्रि ट्रेकर्स परिवार                     

     श्रीरामपूर  .                               

sahyadritrekers.blogspot.com

      

No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...