Monday, December 30, 2019

Hapata Kada and koambad fort trek



हापट्याचा कडा आणि कोंबड गड ट्रेक


बहुप्रतीक्षित असा किल्ले हरिश्चंद्रगड जवळ ट्रेक करायचा हा उद्देश मनात ठेवून काही दिवसांपूर्वी आमचे वकील मित्र तुषार आदिक साहेबांनी विनवणी केली असता  ती लगेच विचाराधीन घेतली आणि लवकरच उरकून टाकू असे खात्री वजा आश्वासन दिले. माझ्या पश्चात त्यांनी बाकीच्या भिडूंना फोन कॉल्स करून जमवाजमव करायला सुरुवात केली अचानक एक दिवस मला त्या ग्रुपमध्ये घेतले सुद्धा!! मी आश्चर्यचकित झालो, एवढ्या जलद आश्वासनाची पूर्तता होतीय याचा एक विलक्षण आनंद झाला. त्याच आनंदात मी माझी नेहमीची झोळी भरून ठेवली, आता प्रतीक्षा होती त्या दिवसाची, एक दिवस अगोदरच आमचा कोल्हापूर चा मित्र मुक्कामी आला होता.मग काय तो दिवस उजेडला गाडीत बसल्यावर एकेक भिडूला घेत आम्ही आमचं मार्गक्रमण सुरु ठेवल, शेवटी पुण्यावरून आमचे तीन मित्र संगमनेर ला आधीच येऊन पोहचले होते. त्यांना सोबत घेऊन  गाडीने वेग धरला रस्त्यातच सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला.तो आनंद घेताना बऱ्याच जणाशी एकमेकांशी ओळख नसल्याने आमच्या वकील मित्राने त्याच्या शैलीने जी सर्वांची ओळख करून दिली ती ओळख म्हणजे  आम्हा सर्वांची मैत्री ही कायम स्वरुपी घट्ट कशी राहील अशा स्वरूपाची होती.आणि आमचा मैत्रीचा प्रवास खऱ्या अर्थाने चालू झाला तो पाचनई गावासाठी. प्रत्येकाचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. यावेळी संपूर्ण नवे चेहरे होते पण त्यातले एकूणच सगळे प्रसन्न, हसतमुख चेहरे पाहून आम्ही नेहमीचे भटके अगदी मनातून आनंदी झालो. हमरस्ता सोडून गाडीने गावाकडचा रस्ता धरला आणि उत्कंठा शिगेला पोहोचली. चार तासांच्या रटाळ प्रवासाने, झुंजूमुंजू व्हायला अगदी थोडासा वेळ शिल्लक असताना गाडी पाचनई येथे पोहोचली.थोडसं “पाचनई” ह्या गावाच्या नावाविषयी...

पाचनई हा अपभ्रंश आहे पाच नद्यांचा, या पाच नद्यांना कोणतीही नावे नाहीत, त्या अनामिकच आहेत. गावाच्या उत्तर बाजूस समोरच्या उभ्या असलेल्या आडव्या कड्यावरून आणि त्याच्या समोर असलेल्या गायरान कड्यावरून एकूण ५ नद्यांचा उगम होतो ज्या धबधब्यांच्या स्वरुपात खाली कोसळतात, अर्थातच पावसाळ्यात. त्या पाच नद्या सपाटीवर येवून एकत्र येतात आणि पुढचा प्रवास करतात. त्या पाच नद्यांचे उगमस्थान म्हणजेच पाचनई होय. याच गावाच्या शिवारातून  हरिश्चंद्रगड कडे एक वाट जाते, तीच ती वाट म्हणजे पाचनईची वाट...  समोरच्या लांबसडक काळ्याकभिन्न कातळ कड्याकडे नजर गेलीच,त्या कड्यावरून पावसाळ्यात जे धबधबे वाहतात ते पाहण्या सारखे असते.  आमचा पाचणाई गावातील सहकारी प्रकाश आमची वाट पाहत च होता  त्याला घेऊन लगेचच आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच हप्ट्याच्या कडा कडे निघालो कारण अंधार पडण्यास सुरवात झाली होती.साधारणतः ४ किमी.अंतर कापून झाल्यावर शेवटचा थांबा म्हणजे जेथून     हापट्याचा कडा कडे जाण्यासाठी  २-३ कमी. पायी जावे लागणार होते.तिथे गाडी थांबवून सर्व मुक्कामाचे साहित्य घेऊन आम्ही जंगलातून निघालो जसं जसं पुढे जात होतो तस तसं सह्याद्रीच्या प्रेमात सगळेच पडत होते कारण आमच्या बऱ्याच जनाचा हा पहिलाच आनंद होता.कड्या पर्यंत पोहचण्यास येव्हणा अंधार झाला होता त्या मुळे बऱ्याच जणांना आपण इथे कुठे आलो हे कळतच नव्हते.सर्वांनी आपले सामान उत्रवून प्रकाश ला टेंट लावण्यास मदत केली.त्या नंतर स्वयंपाक तयार होईपर्यंत गप्पांची गाण्याची मैफल चालू झाली. कोण कुठल्या पदावर आहे कोण काय करतो ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन मैत्री हा एकमेव पद घेऊन सर्व जण शेकोटी घेता घेता नाच गाण्यात मनसोक्त रमले होते.आता आमचे जेवण पण तयार झाले होते.सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेऊन परत सर्व जन शेकोटी पाशी येऊन गप्पा मारत बसले.जसं जशी रात्र सरत होती तसं तशी एकेक मंडळी आपापल्या तंबूत जाऊन झोपत होती.सकाळी जाग आली ती आमच्या सुशील नावाच्या मित्राच्या वेग वेगळ्या आवाजानेच .जसं जसे एक एक तंबूच्या बाहेर येत होते तस तसे आपण स्वर्गात आल्यासारखे सगळ्या मित्रांना वाटत होते खरचं धरती वरच सौंदर्य पहायचं असेल तर सह्याद्रीत च कारण आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा पूर्ण अंधार पडला होता.
.                                     आम्ही सगळ्यांनी चुळ भरून चहा घेऊन  कडा पाहण्यास निघालो सुंदर आणि तितकाच काळजाचा ठोका चुकवणारा पाहताना तिथे फोटो घेण्याचा मोह काही कोणाला अवरला नाही .मग काय एक एक पोज देऊन आमचे मॉडेल मित्र तयार.कडा पाहून झाल्यावर गरमा गरम मसाले भात खाऊन सामानाची आवरा अवर करून आम्ही खऱ्या अर्थाने ट्रेक साठी निघालो आमच्या सर्व बॅगा गाडीत ठेऊन कोंबड गड ट्रेक चालू केला पुढे चालून आल्यावर घळाईच्या मार्गाने चढाई चालू झाली काही चढाई चालू झाल्यावर आमच्या पैकी दोन मित्रांनी परत खाली जाण्याचा मार्ग निवडला बहुतेक त्याणला पुढे येणाऱ्या कसोटीची कल्पना आली असावी.इथून पुढे खरी प्रत्येकाची शरीराची कस लागणार होती कारण समोर २-३ रॉक पॅच आणि निसरडी माती होती आमचा गाईड प्रकाश ने सर्वात पुढे आणि मी सर्वात मागे राहून सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार होतो पण सर्वांनी एकमेकांना मदत करत खडतर अशी काळया पाषाणातील वाट प्रतिकूल परिस्तीत पूर्ण तर  केली. परंतु चढताना झालेली कसरत पाहता खाली उतरणे तीतकेशे सोपे नव्हते म्हणून आमच्या गाईड प्रकाश ने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला तो मार्ग तसा सोईचा आणि झाडे जुडपातून जाणारा असल्याने उतरताना  फारशी काही कोणाला कसरत करावी लागली नाही.
सर्व जण खाली आल्यावर मनोमन मानत मला खूप शिव्या दिल्या असतील पण आपण हा गड सर करून सुखरूप आलो याचे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे खूप  काही सांगण्यासारखे होते.खरं तर कोंबड गडाला तसा काही इतिहास नाही पण एखादा छोटासा आणि लवकर होऊ शकेल म्हणून निवडला गेला.
कारण मी तो दोन वर्षापूर्वी भर पावसात केला होता.आता सर्व जण मनाने आणि शरीराने देखील खूप थकले होते.वाटेतच एका छोट्या नदीवर अतिशय थंड अश्या पाण्यात सर्वांनी दुंबण्यचा आनंद घेऊन आपला थकवा नाहीसा केला.परतीच्या मार्गावर निघण्यापूर्वी प्रकाश च्या घरी जेवणावर ताव मारला आणि सुंदर अश्या अनुभवाची आणि मैत्रीची शिदोरी जी आपल्या आयुष्यात कायम स्वरुपी राहील ती घेऊन पुन्हा प्रत्येक वर्षी किमान एकदा तरी सर्वांनी एकत्र येऊ ही एकमेकांना हमी देऊन परतीच्या मार्गावर निघालो.


  आणि सर्वात शेवटी.....

महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी किमान दोन दिवसांचा वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!!

सचिन भांड
श्रीरामपुर

फोटो पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा...

https://drive.google.com/folderview?id=1-Nu69mYSqzx_bUhBmVW9diWiFDyn_L-d


Home
View web version
ABOUT ME
सह्याद्री ट्रेकर ...
View my complete profile
Powered by Blogger.

No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...