Wednesday, November 2, 2022

माझी खान्देश दुर्गवारी भाग १.

 दि.३०/१०/२०२२

कधी कधी अचानक ठरवलेली मोहिम पण खुप काही मिळवुन देते  सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडतात. मनात ठरवलेल नियोजन तंतोतंत अंमलात येते. सरतेशेवटी गोड आठवणी आणि चांगला सुखद अनुभव देऊन जाते.

असेच काही माझ्या  बाबतीत घडले. भाऊबीज साठी आलेली बहीण गेल्या एक वर्षांपासून धुळे येथे बदली होऊन आल्यामुळे तिला सोडायला रविवारी ड्रायव्हर ला पाठवणार होतो पण शनिवारी सकाळी अचानक मनात आले,सह्याद्रि भरपूर पालथा घातला त्या मानाने बागलाण ,खान्देश प्रांत नेहमीच मला भेटण्यासाठी आजही खुणावत आहे.त्यातच गेले काही दिवसांपासून कुठे भटकायला न गेल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या भाषेत बोअर होत होत त्यातच  या रविवारी एखादा चांगला ट्रेक करूया म्हणून लगेच आमच्या बहिणाबाई ला सांगितले.मीच येतो तुला सोडवायला आज रात्री निघुया. आणि माझा'खान्देश दुर्गवारी चा प्लॅन आखला. सुरवात कुठल्या किल्ल्यापासून करायची कारण एका दिवसात जेवढे किल्ले सर करता येतील तेव्हडे करायचे होते

आणि सुरवात "लळींग, सोनगीर,, डेरमाळ ,आणि गाळणा करायचे ठरवले.

 लगेचच प्लानवर शिक्कामोर्तब करून टाकले आणि रात्री  आठ वाजता आम्ही निघालो, आत्ता पर्यंत बरेच ट्रेक करून झाले  आहेत सहसा मला असे कधी होत नाही पण या वेळेस मात्र मी भलताच एक्साईट झालो होतो.कारण सह्याद्रि च्या बाहेर ट्रेक करण्यासाठी बऱ्याच दिवसांनी निघालो होतो. आम्ही रात्री बारा वाजता तिच्या घरी पोहोचलो एव्हाना बऱ्यापैकी थकलो असल्याने लगेच झोप लागली गेली

सकाळी सहा वाजता गजर वाजला, उठून तयारी करून सात वाजता  छोट्या भाचा ला सोबत  घेऊन लालिंग किल्ल्याला निघालो. आता सुरू झाली होती माझी 'खान्देश दुर्गवारी'.

तीस ते चाळीस मिनिटात लळिंग गावी पोहचलो.धुळे वरून निघाल्यानंतर  महामार्गाच्या उजव्या हाथाला, माथ्यावर तटबंदी धारण केलेला लळिंग किल्ला दिसला.

त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झाली आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याचे टाके, धान्य कोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.






किल्ल्याच्या पायथ्याशी लळिंग गाव आहे. गावातूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. लळिंग पाहून झाल्यावर जेवण वैगरे करून सोनगीर किल्ला पाहण्यासाठी निघालो धुळ्यापासून साधारण २०कि.मी अंतरावर असणा-या गडपायथ्याला सोनगीर गाव लागते;तिथे पोहोचताच दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.गावातून किल्ल्याकडे जाणा-या पायवाटेने काही मिनिटातच आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची एकसलग तटबंदी व त्यामध्ये असणारे वैविध्यपूर्ण आकाराचे चौकोनी बुरूज पाहायला मिळतात.सोनगीरचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने अधिक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची बरीचशी पडझड झाली असून त्यातील प्रवेशद्वार मात्र सुरक्षित उभे आहे .येथून आत प्रवेश केल्यावर सुंदर नक्षीकामयाअसलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत पडते .ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पाय-यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सातीआसरा देवीची घुमटी लागते.सातीआसरा देवी ही लेकुरवाळ्या मातांचे दैवत असल्याकारणाने येथे नवस म्हणून छोटे पाळणे ठेवलेले आहेत.

गडमाथ्यावर पोहोचताच आपणास जी तटबंदी दिसते तिथे मोठे दगड न वापरता अनेक लहान दगडांचा एकमेकांवर रचून वापर केला आहे.

आपण ही तटबंदी न्याहाळून गडाच्या मधून जाणा-या पायवाटेने दक्षिण बाजूला असणा-या बुरूजाच्या माथ्यावर जायचे .या बाजूस तट तसंच बुरूज वगळता इतर कोणतेही दुर्गअवशेषर शिल्लक नाहीत.त्यामुळे येथून माघारी फिरून आपण गडाच्या उत्तर टोकाकडे जायचे.या वाटेवर आपणास इतिहासकाळात तेल साठविण्यासाठी वापरले जाणारे एक दगडी रांजण निदर्शनास पडत.गडावर बऱ्यापैकी आता पडझड झाल्यामुळे फारसे अवशेष पहावयास नाही मिळत.इ. स.१३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती .पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने सोनगीरवर हल्ला चढवून हा किल्ला जिंकून घेतला.पुढे म्हणजे इ.स. १६०१ मध्ये खानदेशामधील फारूकी घराण्याचे राज्यसंपुष्टात आले.त्याकाळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता.त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले .त्यामुळे अकबर बादशाहने त्यास सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले.१७५२ पर्यंत हा किल्ला मोगलांच्याच ताब्यात होता,पण त्याच वर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला .त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नाराशंकराकडे दिला .१८१८ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. 





हा किल्ला पाहून झाल्यानंतर मी माझा मोर्चा थाळनेर कडे वळवला सोनगीर पासून साधारण ३५ कि.मी.असणाऱ्या तापी नदी च्या किनाऱ्यावर असलेल्या थाळनेर गावापासून १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. आज दुदैवाने किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत. किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे.

किल्ल्यात फारसे काही बघण्यासारखे नसले तरी गावात दोन ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.

१) जमादार वाडा :- गावातून पाताळेश्वर शंकर मंदीराकडे जाताना एक गढी आपले लक्ष वेधून घेते. त्याला स्थानिक लोक ‘‘जमादार वाडा’’ म्हणतात. या गढीत आजमितीला अनेक कुटुंब रहातात. वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दारा खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. घरातील साध्या खुंट्या, कोनाडे यांच्यावरचे नक्षीकाम गढी बांधणार्‍यांच्या रसिकतेची कल्पना देते. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते आस्थेने गढी दाखवतात, पण त्याच्या इतिहासाबद्दल व पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल ते अनभिज्ञ आहेत. गढीच्या प्रवेशद्वाराशेजारी रामसिंग व गुमान सिंग ही नावे लिहीलेली दिसतात.

२) १० कबरी:- थाळनेरवर राज्य करणार्‍या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी थाळनेर गावात आहेत. त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे, १) मलिक राजा २) मलिक नसिर ३) मिरान अदील शहा ४) मिरान मुबारक खान

थाळनेर हा किल्ला  मलिक फारुकी च्या काळात खानदेश प्रांताची राजधानी होती.दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्याकडून मलिकवर खान याने थाळनेर व करवंद या परगण्यांची जहागिरी मिळविली. त्याने थाळनेर ताब्यात घेवून फारुकी घराण्याची सत्ता स्थापन करुन 1370 मध्ये थाळनेर येथे त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधला. एका बाजूने तापी नदी, तर दुसऱ्या बाजून तटबंदी आणि बुरुज बांधून किल्ला भक्कम करण्यात आला होता. 1600 मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशाह फारुकी याचा पराभव करीत थाळनेरवर ताबा मिळविला. मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर निंबाळकर, होळकर घराण्यांनीही या किल्ल्यावर राज्य केले आहे. इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लॉप याने मराठ्यांचा पराभव करुन तो 1818 मध्ये इंग्रजी राजवटीच्या अंमलाखाली आणला.






आता बऱ्यापैकी अंधार पडायला लागल्याने माझ्या प्लॅन मधला चौथा किल्ला गाळण न करताच थांबलो .  लवकरच दुसऱ्या भागात खान्देश चे राहिलेले किल्ले करण्याचा निश्चय करून परतीचा मार्गे लागलो.

या सर्व प्रवासात निश्चितच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सह्याद्रि च्या मनाने या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नसली. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तेअस्तित्वाशी झुंजत उभे आहेत.

इतिहास संदर्भ :- ट्रेकक्षितिज

सचिन भांड

Wednesday, October 19, 2022

दिवाळी आणि किल्ले बांधणी

 

डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?

तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला

कुणी फिरस्ता हिंडता वनी,

वदला ऐशी आर्जववाणी ।

ऐकून त्याची आर्त याचना,

आली येथल्या जडा चेतना।।

मला विचारा मीच सांगतो,

आधी या माझ्याकडे, सरसावत एकेक पुढे,

हात उभारूनि घुमू लागले, डोंगर किल्ले बुरूज कडे ।।

कवी यशवंत यांनी सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर उभ्या असलेल्या गडकोटांबद्दल लिहून ठेवलेले हे सुंदर काव्य. गडकोटांमध्ये रमणाऱ्यांना ते अनेकदा आत्मगानच वाटते. या काव्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे दिवाळी आलीय आणि दिवाळी म्हटले की आपल्या सर्वांना आता ओढ लागते ती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची! दिवाळी म्हटले की, जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. लहानांच्या विश्वातला आणि मोठय़ांच्या आठवणीतला असा हा दिवाळीचा किल्ला! 

खर तर लहान असताना मी  कधी ही किल्ला बनवला नाही कारण आपल्या भागात पुणे मुंबईच्या मानाने ही प्रथा फारशी परिचित नव्हती त्यातच त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज समजले ते फक्त शाळेतली पुस्तकांच्या पुरतेच पण पुण्यात असताना आमच्या ग्रुप ने जेंव्हा किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली तेंव्हा खर तर कळले की किल्ले दिवाळी मध्येच का बनवतात. तेंव्हा खर तर त्या लहान मुलांचा अगदी त्या सिमेंट च्या जंगलात देखील ज्या पद्धतीने ती मूल त्या मातीत  रममाण होत होती आपला इतिहास जपत होती ते पाहून आपण ते बालपण जगण्यापासून किती वंचित राहिलो हे जाणवले आणि एकीकडे आपल्याकडे सगळी मुबलकता असून देखील या संस्कृती पासून बऱ्यापैकी आपली मुल ही अपरिचितच आहे.खर तर या किल्ले बनवण्यासाठी लागणाऱ्या माती पासूनच आपला इतिहास ही लहान मुले शिकायला लागतात आणि त्याच मुळे कदाचित आज ही आपण बघतो आपले ट्रेकिंग क्षेत्र असो अथवा इतिहास अभ्यासक असो ते ही या शहरी भागातून बघावयास मिळते असे मला वाटते.

म्हणूनच जेंव्हा पासून आपल्या गावी आलो आणि आपला हा परिवार उभा राहिला तेंव्हा पासूनच ही संकल्पना मनात घर करून उभी होती . ही संकल्पना मागील वर्षी माझ्या सहकाऱ्यांच्या समोर मांडली कारण अशा प्रकारची स्पर्धा भरवणारे सह्याद्रि ट्रेकर्स हा आपला पहिलाच श्रीरामपूर मधील ग्रुप होता आणि बघता बघता पहिल्याच वर्षी श्रीरामपूर च्या या छोट्या मावळ्यांचा इतका उत्साह होता की पहिल्या च वर्षी पन्नाशी च्या आसपास छोट्या मावळयानी सहभाग नोंदवून आपला हा वैभवशाली इतिहास अनुभवला.

आता हे किल्ले का बनवायचे आणि दिवाळीतच का बनवायचे हे देखील जाऊन घेणे तितकेच महत्त्वाचे .

 शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या सहाय्याने स्वराज्य उभे केले आणि तमाम महाराष्ट्राला दिवाळी साजरी करता येऊ लागली कारण तो पर्यंत कायम पारतंत्र्यात राहिलेले आपले पूर्वज कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ त्यातच अमानुष अत्याचार त्या मुळे कुठली दिवाळी न कुठला दसरा पण  महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केले तेंव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी सण हा साजरा होऊ लागला .त्यातच आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड यांना अगदी पूर्वीच्या काळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. आपले किल्ले हे पूर्वजांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा हि त्याच्याशीच निगडित आहे. आपल्या लहानग्यांना ह्याच इतिहासाची आणि पराक्रमाची माहिती व्हावी तसेच त्यांना त्याची गोडी लागावी हा एक उद्देश दिसून येतो.म्हणूनच कदाचित हा  सण साजरा करताना महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आठवण म्हणुन दिवाळीत किल्ला करण्याची प्रथा चालू झाली असावी.

असो, या निमित्ताने का होईना लोक किल्ल्यांची आठवण ठेवायला लागले आणि आपल्या लहानग्या सोबत आपणही इतिहास ह्या किल्ल्यांचा रूपाने का होईना अनुभवू लागले हे काय कमी आहे का .

Friday, September 16, 2022

सफर एका ऐतिहासिक राजमार्गाची


 चावंड आणि नाणेघाट ट्रेक

दि.११ सप्टेंबर २०२२

आम्हा सह्याद्री च्या भटक्यांना  फक्त भटकायला निम्मित लागते मग ऊन, वारा, पाऊस काहीही असो भटक्यांना त्याची फिकीर नसते कारण ह्या  सह्याद्रीचा मुकुटमणी शोभणारे गडकिल्ले आम्हास  सतत खुणावत असतात. त्यात पावसाळ्यातील भटकंती म्हंटल्यावर आमच्या परिवाराची कार्टी तर गुढघ्याला बाशिंग बांधूनच तयार. आमचं तर आता अस झालय न जस लग्नाची तारीख धरली की लगबग  चालू होते तसे आमचे फोन वाजायला लागतात सर मी येणार म्हणून.गेली अनेक वर्षे सह्याद्रि फिरतोय  पण गेली ३-४ वर्षांपासून जो काही सह्याद्री पालथा घातला त्यात आमच्या या ठरलेल्या तारखांच्या मोहीमा आजपर्यंत क्वचित एखादी सोडल्यास कधी चुकल्या नाहीत अन त्या कधी चुकणार हि नाहीत. त्याच कारण लिहीत गेलो तर त्यावर एक वेगळा ब्लॉग नक्कीच होईल. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळी ट्रेक चा शेवट अशा ट्रेक ने करायचा ज्याच्या आठवणी चिरंतन मनात कायम राहतील.म्हणूनच काही वर्षांपूर्वी आमच्या ग्रुप ने असच भर पावसात चावंड आणि नाणेघाट केला होता तोच ट्रेक परत करायचा विचार आला . त्यात जीवधन किल्ला अन परिसराशी माझ एक आपुलकी च नात तयार झालय कारण सह्याद्रि प्रतिष्ठान बरोबर काम करताना पायरी मार्ग मोकळा करण्याच्या कामात थोडाफार खारीचा वाटा उचलता आला त्यामुळे तो एक अभिमान मनाशी बाळगून होता.

आमच्या परिवारात काही जणांना तर इतकं व्यसन लागलंय की त्यांचं कायम म्हणणं असत  " कुठंबी चला सर  पण आम्हाला सोडून जाऊ नका".इतकं त्यांचं ट्रेक साठी काही पण अन कधी पण अस झालंय.

    खर तर सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाण आणि याच बुलंद गडदुर्गांनी नटलेला निसर्गरम्य तालुका म्हणजे जुन्नर. जुन्नर तालुक्यात ८ किल्ले, १२ लेणी समूह, अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आता आलं पुढच नियोजन निघायची वेळ, पोटापाण्याचा प्रश्न. अहो शिक्षण घेताना कधी एवढं नियोजन केलं नसल तेवढं नियोजन सह्याद्रीतली  मोहीम करायला लागतय पण सगळ्या मोहिमेत माझ्या  सोबत असलेल्या सहकाऱ्यांमुळे नियोजन कस पद्धतशीर असतय. आणि ११ सप्टेंबर ला रात्री १२.३० वाजता निघायचं  ठरल.अन नेहमी सारख ह्या वेळेस तरी आम्हाला निघायला उशीर होणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेऊन आमचा प्रवास चालू झाला.

सातवाहन काळात प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण हि सातवाहन राजांची राजधानी होती तर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर हि उपराजधानी होती. त्यामुळेच प्राचीन काळापासून जुन्नरचे व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यात प्रामुख्याने शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, नारायणगड, निमगिरी, हरिश्चंद्रगड, सिंदोळा हे किल्ले येतात तर दार्या घाट, माळशेज घाट, नाणेघाट हे प्रमुख प्राचीन घाटमार्ग येतात.नालासुपारा कल्याण, बंदरातून येणार माल हा जुन्नर मधूनच पुढे जाई याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली.

आता  जसा जसा चावंड जवळ येत होता तस तस पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात त्याचा शंकू सारखा दिसणारा आकार, ताशीव कडे, गडाची भव्यता लांबूनच दिसून येत होती. पहाटे ०५:०० च्या सुमारास आम्ही चावंड पायथ्याशी  पोहोचलो तिथे आमचा सह्याद्रि मधील सवंगडी मारुती वाटच पहात होता अजून जराशी काळोखी रात्र असल्याने सर्वांना बस मधेच आराम करावयास सांगितले आणि एक तास आराम करून सर्वजण फ्रेश होऊन तयार झाले. सकाळी ०८ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. गड चढताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एका गोष्टीच सुख मात्र होत ते म्हणजे कोणतही ओझं घेउन न चढण्याच, नाही तर सगळा सरंजाम सोबत घेऊन गड चढायची सवयच लागलीये आम्हाला. चावंडची चढाई तशी काही अवघड नाही अर्ध्यापर्यंत प्रशस्त सरकारी पायऱ्या केलेल्या आहेत तर पुढच्या भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या मार्गाने तासाभरात गडावर येता येते. जसजसे किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु होती तसतसे खाली उंचावरून नजर पुरेल त्याठिकाणी निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आविष्कार पहायला मिळत होता तो नजरेत साठवून घेत पुढे चालत होतो .चावंड किल्ला नेमका कोणी बांधला याचे पुरावे सापडत नाहीत. बहामनीचे साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर ज्या प्रमाणे आदिलशाही कुतुबशाही निर्माण झाल्या त्याचप्रमाणे इ .स १४८५ साली मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली व त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाला त्यात चावंडचे नाव आढळते. इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीला मुघल व आदिलशाह यांच्या पासून वाचवण्यासाठी शहाजी राजांनी केलेल्या तहात चावंड मुघलांच्या ताब्यात गेला. गडाला अनेक नावे आहेत चामुंड, चावुंड, चावंड हि नावे गाडावर असलेल्या चामुंडा देवीच्या नावावरून आली असावीत. पुढे स्वराज्यात मावळ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी गडाचे नाव प्रसन्नगड ठेवले. पुढे पेशवे काळात राजकीय कैदी ठेवण्यासाठी गडाचा वापर होई. पायऱ्या चढून वर आल्यानंतर कातळात कोरलेला गडाचा दरवाजा लागला त्यावर बारीक गणेश शिल्प कोरलेले आहे.

किल्ले चावंड प्रवेशद्वार

आम्हला गडावर असणाऱ्या सलग सात टाक्यांचे म्हणजेच सप्तमातृका यांचे प्रमुख आकर्षण होते. आम्ही लवकर निघाल्यामुळे अजून तरी गडावर कोणीच न्हवतं फक्त आमचाच ग्रुप होता. दरवाज्यातून डाव्या बाजूने पुढे गड फेरीसाठी निघालो तर वाटेत हरिश्चंद्रगडावर आहे तशीच पुष्करणी पाहायला मिळाली त्यातील पाण्याची अवस्था फारच वाईट होती. पुष्कर्णीच्या देवड्यांमध्ये भग्न अवस्थेत पडलेली महादेवाची पिंड, गणेश मूर्ती आढळली. समोरच पडलेली कमान व त्याखाली महादेवाची पिंड आहे तिथेच तुटलेल्याला अवस्थेतला नंदी आहे. गडावर अशे भरपूर अवशेष वाईट अवस्थेत पडून आहेत त्यावर संपूर्ण गवत माजल्याने ते नजरेस पडत नाहीत व थोडा आडवाटेवरला किल्ला असल्याने सहसा इकडं कोणी फिरकत नाही. पण ह्या आडवाटेवरल्या गडांच्या अनवट वाटा तुडवल्याशिवाय त्या गडाचं अन तिथं घडलेल्या इतिहासच महत्त्व कळत नाही. ह्या सगळ्या वास्तू कॅमेऱ्यात कैद करून घेतल्या.

गडावरील अवशेष

गडाच्या मध्यभागी असलेल्या छोट्या टेकडीवर चामुंडा देवीचे मंदिर आहे. चारही बाजुंनी गडाचा माथा पालथा घातला जिथून गडफेरीसाठी सुरुवात केली तिथे येऊन पोहोचलो पण सात टाक्या कधी मागे गेल्या कळलंच नाही.

सप्तमातृका 

    प पुढे वाट टेकडीवर असलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराकडे वळवली. चामुंडा देवी प्रामुख्याने राजस्थान, बिहार या प्रदेशात आढळते. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. मंदिरात देवीची शेंदूर लावलेली प्राचीन मूर्ती आहे. आजूबाजूला मंदिराचे जुने अवशेष आहेत आताचे नवीन मंदिर हे गावकऱ्यांनी बांधलेले आहे. गडावरून माणिकडोह धरणाचा सुंदर नजर दिसतो. गड बघून झाल्यानंतर परतीच्या मार्गाला लागलो. आता आमहाला खुणावत होता तो सातवाहनकालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग नाणेघाट. गाडीत बसल्यावर शांत कुठं कोण बसतंय, मग एकमेकांची खेचत गाडी नाणेघाटाच्या दिशेनं दिमटीवली. वाटेत अंजनवाळे गावा जवळ एकाच डोंगर रांगेवर असलेली लहान मोठे सुळके दिसतात. हा डोंगर म्हणजे व्हराडी डोंगर गावकऱ्यांकडून या डोंगरात वऱ्हाड लुप्त झाल्याची कथा सांगितली जाते म्हणूनच त्याला वऱ्हाडी डोंगर म्हणतात.

      सह्याद्रीचा कोणताही डोंगर बघितला कि मनात अनेक विचार चालू होतात. त्याचा आकार, त्याची रचना, त्याला काही इतिहास आहे का? त्याचावर काही बांधकाम असेल का? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यावर जायची वाट कुठून असेल. हे असं सगळ माझ्या डोक्यात घुटमळत असत. जस जस घाटघर जवळ येत होत तसं तस एक हलकीशी धुक्यांची चादर अंगावर येत पुढे येणाऱ्या स्वर्ग सुखाची चाहूल देत होती. नाणेघाटाला पोहचताच वाटेत असलेला भला मोठा दगडी रांजण आपल स्वागत करून आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात घेऊन जातो. नाणेघाट म्हणजे सातवाहन कालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग. नाणेघाटचे बांधकाम सातवाहन काळात इ.स.पू. पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. नालासोपारा कल्याण बंदरातून येणारा माल जुन्नर हूनच पुढे पैठणला जाई त्यावेळी कोकण व जुन्नरला जोडणारा नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता.  सातवाहन हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात मौर्य नंतर भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. नाणेघाट रचना हि डोंगर खोदून केलेली आहे. इथं अनेक गुहा आहेत या प्रत्येक गुहे समोर पाण्याचं टाकं पहायला मिळत. इथं असलेल्या दगडी रांजणाचा वापर जकातीचे पैसे टाकण्यासाठी केला जात असे. व्यापाऱ्यांनी घाटाचा वापर केल्याबद्द्दल रांजणात पैसे टाकले जात हा दगडी रांजण म्हणजे त्यावेळचा टोल नाकाच. गणेश मूर्ती, कातळावर कोरलेले हनुमान शिल्प, दगडी रांजण, गुहेत भिंतींवर कोरलेले शिलालेख, या शिलालेखा बाबत सांगायचं झाल्यास हा शिलालेख ब्राम्ही भाषेत सातवाहन काळातील साम्रादनि नागणिका हिच्या काळात लिहिलेला वाचण्यास येतो या शिलालेखात सातवाहन राजांनी जे काही पराक्रम, दानधर्म केले आहेत त्या विषयी चा उल्लेख आढळतो असाच शिलालेख आपल्याला नाशिक जवळील पांडवलेणी इथे देखील आढळतो कातळात कोरलेल्या पायऱ्या स्थापत्य शास्त्राची सारी अदभूत किमया इथं अनुभवायला मिळते.

असा हा राजमार्ग बघून झाल्यावर आम्ही आमचा तांडा नानाच्या अंगठया कडे वळवला खरा पण वर आल्यावर दाटधुक्या मुळे कड्याच्या समोरील दृश्य काहीच दिसत नव्हते आणि बऱ्याच वेळेस पावसाळी ट्रेक ला आम्हाला हुलकावणी देणारा पाऊस या वेळी आमच्या स्वागतास सज्जच होता असा ह्या पावसाचा आणि खळखळनाऱ्या झऱ्यांचा तर काहींनी मनमुराद आस्वाद लुटला त्यात सर्वात म्हणजे आमची जेष्ठ मंडळी अन बाल गोपाळ त्यांचा चेहऱ्यावर चा आनंद पाहून त्यांना कुठलीही घाही न करता त्यांना त्यांचा आनंद घेऊ दिला.आणि सर्वांना सुखरूप खाली आणून आम्ही रिव्हर्स वॉटर फॉल कडे मार्गस्थ झालो.

जस जसे आम्ही धबधब्या जवळ येत होतो तस तसे अधून मधून  धुक्याच्या चादरीतून वानरलिंगी सुळका हळूच डोके वर काढत होता.वानरलिंगी सुळका म्हणजे सातशे-आठशे फूट उंचीचा जीवधन किल्ल्यापासून वेगळा झालेला अजस्त्र अभेद्य बेलाग खडा सुळका. जेंव्हा जेंव्हा जीवधन ला येतो तेव्हा तेव्हा इच्छा होत असते एकदा का होईना हा सुळका सर करायचा पण अजून तरी तो योग् आला नाही पण यावर्षी तरी तो सर करायचाच हा निश्चय करून आम्ही फ़ॉल कडे वळालो.

पावसाळी ट्रेक ला जायच म्हटल कि पावसाच्या सरी अन धबधबा असेल तर अजून मनमोहक वाटत. आणि त्यात जर नाणेघाट ला आलात अन  उलट्या पाण्याचा धबधबा न पाहताच गेला तर तुम्ही ह्या ट्रेक च्या सर्वात अविस्मरणीय क्षणाला मुकलात म्हणून समजा.

येथील खासियत म्हणजे उलट्या पाण्याचा धबधबा.अगदी पावसाच्या सरी कोसळाव्या त्याप्रमाणे डोंगर दऱ्यातील पाणी या ठिकाणी वाहत येते आणि कड्यावरून खाली कोसळण्या ऐवजी उलटे वरती येते. परंतु वातावरणात कुठल्याही प्रकारची हवा नसल्याने आम्हाला  काही तो अनुभव घेता आला नाही. परंतु वरुण राजाने हलक्याश्या सरी आमच्या अंगावर शिंपडून ती इच्छा देखील पूर्ण केली  क्षणभर तिथून दिसणारा जीवधन ,वानरलिंगी सुळका त्यात अधून मधून येणारे दाट धुक्यांचे लोळ ते चित्र डोळ्यात साठवून ठेवावे असे होते.असे हे अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवून आम्ही चिंतामण कडे जेवणासाठी निघालो आता एव्हाना लवकरात लवकर पोटातल्या भट्टीत लागलेली आग विझवायची होती त्या मुळे सर्वांनी च आपली पावले वाढवली अन तिथे सर्वांनी मनमुराद जेवणाचा आस्वाद घेऊन परतीचा प्रवासाला लागलो

निसर्गाने नटलेल्या व तितकाच इतिहास संपन्न असलेल्या ह्या एक दिवसाच्या मोहिमेत भटकंतीत भरपूर काही जगायला मिळालं  सिमेंटच्या जंगलापासून दूर जिवलगांसोबत सह्याद्रीच्या सानिध्यात इतिहास उलगडणाऱ्या आड वाटा जगायला मिळाल्या. 


सर्वांचे पुनःश्च धन्यवाद

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स,परिवार 🚩

Thursday, September 1, 2022

दूधसागर एक फेसाळते सौंदर्य

     


दूधसागर ट्रेक 

27& 28 ऑगस्ट 2022

    एक काळ असा होता की गोवा म्हंटल की कधीही तयार असायचो अन आता कोणी म्हंटल का काहीतरी कारणे देऊन टाळायचा प्रयत्न करतो कारण जेव्हा पासून सह्याद्रि फिरतोय तेव्हा पासून तिथले नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! आता नकोसा वाटतो कारण मनात एक विचार येतो  तेवढ्या दिवसात तर माझा एखादा मस्त  range trek पूर्ण होऊ शकेल पण याच गोव्याची आम्हा भटक्यांसाठी  एक बाजू अशी आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. आणि गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. म्हणूनच काही वर्षांपूर्वी माझ्या जुन्या ग्रुप सोबत जाण्याचा योग आला होता पण रस्त्यातच एक वाईट बातमी कानावर आली तिथे एक दुर्घटना घडल्यामुळे दूधसागर धबधबा काही दिवसासाठी बंद करण्यात आलेला आहे त्या मुळे जरा हिरमोड झाला होता खरा पण तिथल्या गाईड ने आम्हाला दुसरा पर्याय दिला तिथूनच जवळ असलेला तांबडी सुर्ला धबधबा पाहण्याचा आणि लागलीच आम्ही तो पर्याय निवडला कारण एवढ्या लांब येऊन खाली हात परत जाणे हे मनाला पटणारे नव्हते आणि तेव्हा पासूनच हा ट्रेक माझ्या buket list  वर होताच पण दरवर्षी काही न काही विघ्न येऊन मुहूर्त काय लागत नव्हता पण  यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना priority वर हा ट्रेक टाकला . आणि वेळेचं गणित जुळून येतय असं दिसताच ही संकल्पना माझे सहकारी चंदन सर आणि उमेश यांच्यासमोर मांडली आणि दोन महिने आधी ट्रेक बुक करून टाकला.

सह्याद्रि परिवाराचा हा महाराष्ट्रा बाहेर आणि रेल्वे ने पहिलाच ट्रेक असल्याने त्याचा संपूर्ण अभ्यास माझ्या जुन्या सहकारी मित्रांच्याकडून करून घेतला ट्रेक ला दोन महिने असल्याने मध्ये एक अंधारबन चा एक अविस्मरणीय ट्रेक केला.

दूधसागर ट्रेक हा माझा महत्वकांक्षी ट्रेक असल्यामुळे पुढे काही घरून विघ्न येऊ नये म्हणून एरवी महिन्यातून तीन  रविवारी तरी बाहेर हिंडणार घरात बसलेलो होतो तेव्हा आम्हा हिंडफिऱ्या लोकांना कायम पडणारे टोमणे म्हणजे आज  चक्क घरी जायच नाही का कुठे असे एक न एक टोमणे गुमान ऐकत बसावं लागत असे.असो मजेचा भाग वेगळा.


आणि तो दिवस उजेडला ठरलेल्या वेळेप्रमाणे श्रीरामपूर स्टेशनवर  इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण एक च्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १६ तास घेते! पण थेट कुलेम स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ५० जणांचा ग्रुप होता. एव्हाना आमची ट्रेन एक एक स्टेशन पार करत असताना  गप्पांचा फड रंगला. मग ट्रेकिंग मधले किस्से, काही खेळ आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुलेम  स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ५० जणांचा ग्रुप, यामुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले!अन तसेही प्रवासात माझे न झोपेच वावडच म्हणा म्हणून पुस्तक चाळावयास घेतले काही तासाभरानंतर जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! मग परत खाली उतरून पाय मोकळे करून यायचे असा क्रम चालू झाला जस जसे कुलेम स्टेशन येत होते तसतसे 5-5 मिनिटाला गाडी थांबत होती कारण रात्री जंगलात उतरण्यास बंदी असल्याने काही दूधसागर ला येणारी मंडळी तिथे उतरली असल्यामुळे  रात्री पासूनच जी मंडळी पोलिसांनी अडवून ठेवलेली  होती  त्यांना गाडीत बसवत होती त्या मुळे रात्रीच्या काळोख्या अंधारात कुठले स्टेशन आले ते समजायला मार्ग नव्हता त्यातच गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास आम्ही कुलेम स्टेशनवर उतरलो.तिथे आमचा गाईड वाटच पहात होता त्याच्या गाडीत आमच्या ब्यागा टाकून  आम्ही लगेचच चहाची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. तो पर्यत सर्वांना ट्रेक च्या सूचना देऊन आम्ही सहा वाजता आमचा ट्रेक चालू केला . तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं.पण परत आम्हाला साडेचार ची ट्रेन पकडायची होती म्हणून मनात ती धाकधूक हाती 

आणि आमचा तांडा मार्गस्थ झाला. सप्टेंबर  महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तांबड्या मातीतील रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. गावातील उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले.तासाभराच्या जंगल पदभ्रमंती नंतर आता आमचा ट्रेक हा रेल्वेच्या पटरी ने चालू झाला एरवी सह्याद्रि चे डोंगर दर्या तुडवानरे आमचे पाय पहिल्यांदाच पटरीच्या मार्गाने रस्ता काटत  होते तो मार्ग इतका अविस्मरणीय होता की नागमोडी तो रेल्वे ट्रेक त्याचा सोबतीला दोन्ही बाजूने घनदाट अरण्य त्या मुळे तिथे फोटो घेण्याचा मोह कोणाला नाही आवरणार पटरिचा साधारण सहा सात किमी च अंतर पार केल्यानंतर इतक्यात दूधसागर चा’  फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूने रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाच एक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. आजूबाजूला असणारे एक विशिष्ट प्रकारच्या झाडांची मांडणी पाहताना. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातुणच चालू लागलो ! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. फोटो मुळे आता उशीर होयला लागला होता पाहिजे त्या वेळात अंतर कटत नव्हते म्हणून मुकाट्याने कॅमेरा बंद केला त्यातच गेली दोन दिवस तब्येत ठीक नसल्याने एरवी हवा हवा सा असणारा उत्साह शेवट पर्यत अजिबातच जाणवला नाही त्यामुळे उशिर होऊ नये म्हणून काही मंडळी च्या वर पहिल्यांदाच  ट्रेक ला  चिडचिड देखील झाली

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता दमट उष्म्यात बदलला होता. तशी चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती.आता एव्हाना नास्ता साठी थोडीफार भूक वाट पाहतच होती न जंगलातच एका घरी सर्वांनी मनसोक्त नास्ता चा आनंद लुटून क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा त्या जंगल वाटेने मार्गस्थ झालो .अन रस्त्यात एक नाला लागला एरवी फक्त काही social मीडियावर पाहिलेला तो झुलता पूल पाहून तर सर्वांचेच मन तृप्त झाले आणि तो सर्वांच्या तोंडावर दिसणारा आनंद पाहून मला देखील त्यांचे हे भाव माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह आवरला नाही तेथून पुढे आल्यावर  थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. डावीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते. एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला.थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो  काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो


ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे असा निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या - गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. सर्व जण ते क्षण धबधब्यासमोर उभे राहून समोरच्याच्या कॅमेरात कैद करत होते. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे मी कॅमेरा काढला देखील पण धबधब्याच्या तुषाराने lence वर सारखे दव तयार होते त्या मुळे हवे तसे फोटो घेता नाही आले  मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.आता वातावरणात बर्या पैकी दमट पणा निर्माण झालेला होता त्या मुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर थकवा आता जाणवू लागला बरीचशी मंडळी पुढे निघून गेल्या मुळे मी नेहमी प्रमाणे मागे थांबलो असल्यामुळे मागे असलेल्यांना धीर देत सर्वांनीच ट्रेक पूर्ण केला आता एव्हाना सर्वांच्या पोटात कावळे हे कोकत होते त्या मुळे सर्वांनीच अतिशय रुचकर अशा जेवणावर ताव मारून स्टेशन गाठले.

काही गोड काही कटू आठवणीत आता ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण सह्याद्रि परिवाराचे महाराष्ट्र बाहेरील  पहिलाच ट्रेक पूर्ण केल्याचे एक आत्मिक समाधान मनात होते. ह्या ट्रेक दरम्यान देखील सर्व सर्व सदस्या च्या मदतीने परिवाराचा हा ट्रेक देखील अगदी सुखरूप पूर्ण झाला त्या बद्दल सर्व सदस्यनचे मनःपूर्वक धन्यवाद


सचिन भांड पाटील

सह्याद्रि ट्रेकर्स, परिवार

                   






Wednesday, July 27, 2022

अंधारबन एक स्वर्ग

 पावसात मस्त भिजायचे, हिरवेगार डोंगर पालथे घालायचे, धबधब्याखाली चिंब व्हायचे आणि भिजून झाल्यावर टपरीवर गरमागरम  भजी आणि चहा आहाहा....! 

असे अनेक अनुभव सर्वांनाच अनुभवायचे असतात. खर तर हे सगळ अनुभवण्यासाठी सगळे जण अगदी आसुसलेले असतात. आणि हे सगळे अनुभव पावसाळी ट्रेक शिवाय कसे येणार. अशा वेळी खरी धांदल उडते ती आम्हा ट्रेकर्सची गड किल्ले करु की धबधबे पाहू की जंगलात जाऊ, असे एक ना अनेक!


आजकाल आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पावसाच्या ट्रेक आणि सहलीला जाण्याची क्रेझ आणि त्यात भर त्या सेल्फीकाठी घेऊन फोटो काढण्याची क्रेझ खूप जास्त वाढली असल्याने घाटाच्या प्रत्येक वळणावर माणसांची आणि वाहनांची धोकादायक तुफान गर्दी आढळते. जर असेच निसर्गाचा ऱ्हास करणारे लोंढे च्या लोंढे इकडे घाटमाथ्यावर वाहू लागले तर निसर्गाचा ऱ्हास लवकरच होईल याची भीती वाटते.

“निसर्गात फिरा परंतु तिथले नुकसान नका करू”  “संवर्धन करायला जमत नाही तर निदान संहार तरीकरु नका .”  हा एक नियम पाळला तरी आपणच आपली जैवविविधता सुरक्षित ठेवून आरोग्य सुरक्षित ठेऊ शकू.

सध्या दररोज च्या बातमीपत्रांमध्ये आपण वाचतो आहोतच की बरेच लोक दारू पिऊन सहलीला जातात तर जातात आणि गडकिल्ल्यांवरदेखील जातात कचरा करतात, असभ्य वर्तन करताना दिसतात, निसर्गाला  हानी पोहोचवतात शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे इतरांच्या चुकीमुळे सगळेच ट्रेकर्स उगाचच बदनाम झाले आहेत.  मागील काही आठवड्यात  ताम्हिणी घाटामधील मधील देवकुंड धबधबा येथील  झालेल्या अपघातामुळे आणि भरपूर पावसाचे प्रमाण वाढल्या मुळे बऱ्याच गडकिल्ल्यावर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आणली होती. पावसाचा जोर घाटामध्ये खूप जास्त असतो.त्या मुळे योग्य नियोजन आणि प्रसंगावधान जाणून घेतलेले निर्णय आणि योग्य मार्गदर्शनाखाली च पावसाळी ट्रेक केलेले योग्य.

असाच एक ट्रेक पावसाळ्यात एकदा तरी आवर्जून करावा तो म्हणजे ताम्हणी घाटातील पिंपरी गावातून सुरू होणार अंधारबन ट्रेक हा ट्रेक मागील वर्षीच करायचं नियोजन होत पण करोनाच्या विळख्या मुळे तो करता आला नाही.

तशी अंधारबन ची भुरळ मला जी पडली ती पंधरा वर्षांपूर्वी आम्ही माझे पुण्यातील काही घाटवाटा फिरणारी मित्रमंडळी कुंडलिका साठी निघालो तेव्हा गावात आल्यावर  अंधारबन विषयी कळल त्या वेळेस अंधारबन ट्रेक फारसा कोणाला माहितीही नव्हता आणि आज जी मळलेली वाट दिसते ती देखील फारशी दिसत नव्हती अशा ह्या गर्द काळोख्या जंगलात फक्त आम्ही आणि आम्हीच होतो असा हा कायम स्मरणात राहणारा ट्रेक कधीही विसरू शकत नाही.

आणि आता तोच ट्रेक परत एकदा करायचा म्हणून नियोजन चालू केले.आणि ट्रेक चा तो दिवस उजेडला.

शनिवारी रात्री 11 वाजता आम्ही अंधारबनकडे जाण्यासाठी ची वाट धरली आणि आमची सकाळ उजेडली ती ताम्हणी घाटाच्या विहंगम दृश्याने ती इतकी की लगेच शहाजी पाटलांच्या डायलॉग चा लागलीच आठवण झाली काय ती झाडे काय ते डोंगर असा सुरेल ताम्हणी घाटातील प्रवास करून आम्ही पिंपरी गावात पोहचलो



 तिथे पोहचल्यावर आमचा गाईड वाटच पहात होता त्याच्याकडे फ्रेश होऊन गरमागरम पोहे आणि चहा चा आस्वाद घेऊन आम्ही सर्वांशी ओळख करून आणि काही सूचना देऊन ट्रेक चालू केला सुरवातीला भात खाचरांची वाट तुडवत आम्ही अंधारबन ची वाट धरली आणि सामोर एक मनमोहक नजारा नजरेस पडला धुक्यात गुरफटलेले डोंगर आणि ओसंडून वाहणारा पाझर तलाव पुढील भटकंती ची उत्कंठा वाढवत होता. तलाव ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि चालू झालं अंधारबन चं दाट जंगल! हे  जंगल ओलांडताना वाटेत अनेक धबधबे लागत होते. कित्येक फूट उंचीवरून कोसळणारे हे धबधबे, कड्याच्या टोकावरून पार करायचा अनुभव खूपच रोमांचकारी होता!



 हे सर्व धबधबे ओलांडत आजूबाजूची दृश्य कॅमेऱ्यात टिपत आम्ही पुढे निघालो. दोन सव्वा-दोन तास चालल्यावर जेव्हा आम्ही जंगलातून बाहेर पडलो तेव्हा एक मोठं हिरवंगार पठार लागलं, जणू हिरवळीचा गालिचाच अंथरल्या सारखं! हिरव्या रंगाच्या सुद्धा इतक्या विविध छटा असतात हे जंगलात फिरल्यावरच कळत . पठारावरून समोर एक नजर टाकली तेव्हा समोर कुंडलिका नदी आणि उंचावरून कोसळत तिच्या पात्रात येउन मिळणारे धबधबे असं विहंगम दृश्य दिसत होतं.अंधारबनातल्या असंख्य ओहोळांची बनते कुंडलिका नदी. या नदीवर भिरा गावाजवळ एक छोटेसे धरण बांधले आहे. त्याचाच जलाशय घाटमाथ्यावरून दिसत होता.


 डोंगरकड्यांवरून सर्व बाजूंनी धबधबे दरीत उतरत होते. आसपासची हिरवीगार वनश्री दरीतल्या बेभान वाऱ्यावर सळसळत होती. त्या दृश्याचा आस्वाद घेत आम्ही काही वेळ स्थिरावलो. दोन-चार फोटो काढून होतायत तेवढ्यात धुक्याचे लोट दरीत उतरू लागले. बघता बघता सारी दरी धुक्याने भरून गेली. दरीतला जलाशय तर दूरच राहिला, काही मीटर अंतरावरचा माणूस दिसणेही अवघड होऊ लागले. धुकं अजून दाट झालं तर पुढची वाट सापडणं मुश्कील होईल म्हणून आम्ही चालण्याचा वेग वाढवला. दरीच्या काठाने जाणारी वाट आता रानात शिरली. दाट झाडीतून वाट काढत आम्ही पुढे सरकू लागलो. तेवढ्यात एक खळाळता ओढा मार्गात आला. त्याच्या वरच्या अंगाला एक लहानसा धबधबा तयार झाला होता. गर्द हिरव्या झाडीत वाहणारा तो धबधबा पाहून भिजण्याचा मोह कुणाला आवरेल? आपसूकच सगळ्यांची पावलं तिथे वळली. भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटून आम्ही पुढे निघालो.




घनदाट अरण्यातून जाणारी पायवाट यापुढची वाट घनदाट अरण्यातून जात होती. वाटेत पाण्याचे लहानसहान ओहोळ आडवे येत होते. लाल मातीच्या लिबलिबीत चिखलातून पचक-पचक आवाज करत आम्ही पुढे चाललो होतो. आधीच ढगांनी अडवलेला सूर्यप्रकाश या अरण्यातल्या दाट पर्णसंभारापुढे हार मानून अंग चोरून बसला होता. गडद धुकं रानात ठिय्या देऊन बसलं होतं. एकंदरीतच सारे वातावरण एखाद्या भयपटात शोभेल असे वाटत होते. या अरण्याला अंधारबन का म्हणत असावेत याची पुरेपूर प्रचीती येथे येत होती त्या मुळेच  तिथे परतीच्या वाटेने येताना एक horrer क्लिप बनवायची माझ्या डोक्यात कल्पना अली आणि सोबत असलेल्या मित्रांच्या सोबत सुंदर अशी ती hoorer क्लिप बनून पूर्ण केली.

तिथून पुढे गेल्यावर बोकड्याचा नाला लागला तो पाहून लगेचच कल्पना आली अंधारबन मध्ये जे अपघात होतात ते याच ठिकाणी कारण पाण्याचा वाढता प्रवाह आणि खाली लगेच दरी  म्हणून लगेच पुढे जाऊन एक दोघांना सोबत घेऊन सर्वना तो नाला रोप चा आधार घेत पार करून घेतला आता या ठिकाणी एक अनुभव आला इथे गर्दी असल्याने काही दुसऱ्या ग्रुप मधील सदस्य खालच्या वाटेने तो ओढा कुठलीही सुरक्षितता न बाळगता क्रॉस करत होती तेव्हा त्यांच्या लीडर ला थोडे उपदेशाचे डोस पाजून त्या सर्वांना वरतून येण्यास सांगितले या असा बेफिकीर लोकांच्या मुळेच आज ट्रेकिंग क्षेत्र बदनाम होत आहे.

हळूहळू नाल्याचा प्रवाह वाढत असल्याचे पाहून आम्ही लगेचच तिथून आल्या त्या वाटेने परतीच्या प्रवासाला लागलो. 

आकाशात दाटलेले कृष्णमेघ आणि मागे उभा ठाकलेला सह्यकडा मोठ्या कौतुकाने आम्हा पामरांची ट्रेक संपविण्याची लगबग बघत होते. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण येतो की त्यात आपण भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊन जातो. अंगात कितीही थकवा असला, निसर्गाने कितीही रौद्र रूप धारण केलेले असले, तरी ती रानावनातली रग्गड वाट संपूच नये असे वाटत राहते. आपल्या मनात उपजतच असलेली निसर्गाबद्दलची अनिवार ओढ कदाचित उफाळून वर येत असावी. ट्रेकिंग सारख्या तंगडतोड साहसी प्रकाराकडे खेचून नेणारी हीच ओढ असेल काय?

मार्गात आलेला ओढा संपू नये वाटणारी ती वाट अखेरीस पिंपरी गावात येऊन संपली. पावसानेही एव्हाना आपली खेळी आटोपती घेतली होतीच आता एव्हाना सगळ्यांच्या पोटातील कावळे हे ओरडायला लागलेच होते सगळ्यांनी सुरेख अशा जेवणाचा आस्वाद घेत हा अविस्मरणीय अनुभव डोळ्यात साचवत अंधारबन चा निरोप घेतला.


शेवटी आवर्जून सांगावेसे वाटते देवकुंड व अंधारबन परिसरात भटकंती करण्यापूर्वी किंबहुना पावसाळ्यातील सर्वच ट्रेक करताना अधिक सतर्क होणे गरजेचे आहे. शिवाय परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व गिर्यारोहण संस्थांनीही सुरक्षिततेचे सगळे निकष आवश्यक सुरक्षित साधनांच्या साह्याने कटाक्षाने पाळायला हवेत, ज्या ठिकाणी धोका संभवतो अशा ठिकाणांपासून त्यांनी माघार घेऊन ग्रुपच्या सुरक्षिततेचा विचार प्रामुख्याने करायला हवा.. शिवाय इतर ठिकाणी भटकंती करताना ओढे-नाले ओलांडताना सुरक्षिततेची संपुर्ण खात्री करावी. परिस्थिती विपरीत असेल तर वेळीच माघार घ्यावी. निसर्गाचा आदर हाच करा भटकंतीचा खरा मूलमंत्र आहे.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,श्रीरामपूर

Thursday, June 23, 2022

कळसुबाई ट्रेक 2022

 जय महाराष्ट्र मंडळी !        

      महाराष्ट्र दोन गोष्टीसाठी खूप जग प्रसिद्ध आहे एक म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या डोंगर दऱ्यामधील सर्वोच्चउंच शिखर कळसुबाई पावसाळा सुरू झाला आणि या वेड्या मनाला वेध लागले ते ट्रेकिंगचे आणि मित्रांसोबत भटकंती करण्याचे. इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही गिर्यारोहक नवीन वर्षाच्या पहिल्या-वहिल्या ट्रेकिंगचा श्री गणेशा  करायचं ठरवल. तो सह्याद्रि मधील सर्वोच्च शिखर सर करण्याचं आणि ते पण नुकतेच आम्हा भटक्यासाठी सुरू झालेल्या आणि निसर्गाने नटलेल्या रस्त्याने म्हणजेच पांजरे मार्गे करण्याच 

.सर्व नियोजनानुसार 18 जूनच्या रात्री 12 वाजता  कळसूबाईच्या दिशेने डोंगर चढून अद्भुत नजाऱ्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो सुरवातीला फक्त 45 च सदस्य घ्यायचे हाच एकमेव विचार होता. कारण पावसाळी दिवस त्यात निसरडी वाट पण मित्र मंडळी च्या आग्रहास्तव 45 चे 80 कधी झाले ते अगदी गाडी मध्ये बसे पर्यत कळलेच नाही . कळसुबाई ब्लॉग सुरु करण्या आधी थोडी कळसुबाई बद्दल माहिती करून घेऊ. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.तसेच दुसरा जो मार्ग आहे तो नुकताच प्रकाशझोतात आलेला पांजरे मार्गे ह्या रस्ताने जायचे झाल्यास एखाद्या ग्रुप सोबत च जावे शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची असंख्य  अख्याइका सांगितली जाते त्यातील एक प्रचलित म्हणजे, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले होते. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.हा ट्रेक आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी केलाय तो बारी मार्गे ह्या मार्गे ट्रेक करणे म्हणजे तितकासा अवघड नाही फक्त खडी चढाई असल्याने दमछाक होणारा तर नक्कीच अन दुसरा म्हणजे खडी चढाई जरी नसलेला पण आपण सर्वोच्च शिखर सर केलंय याचा आनंद देणारा आहे हे निश्चितच जेंव्हा आपण ट्रेक पूर्ण करून खाली येतो तेव्हा जाणवते.                

          असा हा ट्रेक करण्याचे ठरवले आणि आमच्या दोन्ही गाड्या नियोजित वेळेनुसार निघाल्या काळोखी रात्र अन पावसाळी थंडगार वारा त्या मुळे सर्वच गाडी मध्ये झोपी गेले ते इतके की पहाटे कोवळ्या प्रकाशात त्यांचे जेव्हा डोळे उघडले ते स्वर्गसुख घेण्यासाठी अन आपल्या मोबाईल मध्ये ते सौंदर्य टिपण्यासाठी च आणि त्या नंतर लगेचच आम्ही फ्रेश होण्यासाठी आमचा सह्याद्रि मधील सवंगडी नामदेव च्या घरी पोहोचलो तिथे चहा नास्ता करुन आम्ही एकमेकांशी थोडक्यात ओळख करून घेतली आणि ट्रेक दरम्यान काय काळजी घ्यायची याची सुचना देण्यात आली. आत या ठिकाणी काही गोष्टी आवर्जुन सांगाव्याशा वाटतात की जेंव्हा ट्रेक लीडर काही सूचना देतात त्या तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत कारण त्या मागे त्यांचे अनुभव कामाला आलेले असतात तसेच काहीसे अनुभव आम्हाला ह्या ट्रेक दरम्यान आले .कारण प्रत्येक ग्रुप मध्ये भरपूर अंतर जाणवत होते .त्याच प्रमाणे जेव्हा असे अंतर पडते तेव्हा आपण मागील ग्रुप येवोस्तोवर थांबणे अपेक्षित असते त्याच प्रमाणे जेव्हा समोर दोन रस्ते दिसतात अन आपण खात्रीपूर्वक रस्ता नाही सांगू शकत तोपर्यत मागील अनुभवी गिर्यारोहक येउस्तवर तिथेच थांबावे लागते .असो अशा बऱ्याच गोष्टीचे नियमात पालन आपण आपल्या पुढील ट्रेक दरम्यान कराल  याची मला खात्री आहे.असा हा ट्रेक आम्ही सहा ला सुरू करणे अपेक्षित होते पण सदस्य संख्या वाढल्याने सर्वांचे आवरताना ट्रेक चालू करण्यासाठी 8 वाजले आणि आमचा ट्रेक चालू झाला शिखराच्या मध्यानापर्यत येवोस्तोवर अलगत ढगांची चादर केव्हा ओढली ते कळले च नाही तो जो अनुभव होता तो ग्रुप मधील जवळपास सर्वच जण घेत होते त्यातच जोरदार हवा आणि पाऊस सुरू झालेला  अशा परिस्थिती देखील सर्वांनीच कळसुबाई शिखर गाठले आणि आता खाली उतरताना खरी कसोटी लागणार होती पण सर्वांनी अगदी एकमेकांच्या मदतीने गड उतार केला त्यात ज्ञात असलेल्या पैकी अमित ने तर मधल्या फळीत ज्या चिकट वृत्तीने batting करावी त्याच पद्धतीने आमच्या शेवटचा ओव्हर ला काही विशेष न ठेवता सामना एक हाती जिंकून दिला त्या बद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.त्या सोबतच नेहमी प्रमाणे किरण आणि बाकी मंडळी असल्या मुळे लहान मुलांची मला कधीच काळजी वाटत नाही त्या प्रमाणे लहान मुलांना ज्या प्रमाणे सांभाळले आणि सुखरूप पायथ्याला आणले त्या बद्दल देखिल आम्हा पालकांच्या वतीने त्याचे आभार त्या सोबतच शिंदे सर असतिल लिलाचंद, गुप्ता जी, दोन्ही डॉक्टर असतील असा सर्वच ग्रुप मेंबर्स ने सर्वांना सुखरूप पायथ्यापर्यत पोहचवले त्या सर्वांचे मी परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच ह्या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सहा वर्षांच्या मुलापासून वयाच्या 70 री पार केलेल्या सदस्यांनी हा ट्रेक पूर्ण केला त्या सर्वांचेच अभिनंदन.

 ट्रेकिंग करण ही केवळ एक दोघांची जबादारी नसते त्या साठी सर्वांचे च हात कामाला येतात तेच ह्या ट्रेक दरम्यान सर्वांनी अनुभवलं सर्वांचे पुनश्च: आभार .प्रत्येक ट्रेक हा आपल्याला काही न काही शिकवत असतो त्यातील च हा ट्रेक भरपूर काही शिकवून गेला आणि असेच आपल्या परिवाराचे पुढील ट्रेक देखील आनंदी अविस्मरणीय राहतील याची मी ग्वाही देतो.                

     सचिन भांड                            

     सह्याद्रि ट्रेकर्स परिवार                     

     श्रीरामपूर  .                               

sahyadritrekers.blogspot.com

      

Wednesday, June 1, 2022

काजवा मोहत्सव 2022

  सहयाद्री ट्रेकर्स आयोजित,
काजवा मोहोत्सव 2022

वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवर, दगड धोंड्यांवर, पाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्‍यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्येक घटकाला माहीत असत रात्री नंतर दिवस उजाडणारच आहे, फक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणार, त्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साह, आनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो. निसर्गातला जिवंतपणा, पक्षांच्या किलबिलाटासहित त्याच्या स्वछंदी बागडण्यातून सर्वत्र मोकळा आनंदी, ऊत्स्फूर्त जिवंतपणा भरून टाकणार असतो. निसर्गाला या येणार्‍या सृष्टीतल्या बदलाची जाणीव होते. त्यातील प्रत्येक घटक येणार्‍या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपआपल्या परीने त्याच्या स्वागताची तयारी करत असतो. असाच एक चमत्कार सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, रानावनात घडत असतो. ज्यावेळी आपण निद्राधीन असतो त्याचवेळी नभोमंडल जमीनीवर पानाफुलांमध्ये अवतरलेल असत. वैशाख महिन्याच्या शेवटाला रात्रीच्या अंधारात काजव्यांचा थरार सुरू होतो. जंगलात दमटजागी, पाण्याच्या जवळपास हजारो, लाखो किंवा कोट्यवधी काजवे जमा होतात.लहानपणी शेतामध्ये काजव्यांचा मागून धावताना कित्तेक तास घालवलेत. तेव्हा एकटेदुकटे दिसणारे काजवे एखाद्या पारदर्शक डब्यात पकडून गोळाकरायचे,  किती वेळा आणि किती वर्ष हा खेळलो असेल आता आठवत नाही. लहानपणी जेव्हढे काजवे दिसायचे तेव्हढेही काजवे आता गावी दिसत नाहीत याची खंत असायची मनात. सहा वर्षापूर्वी रात्री असच कळसुबाई चढताना अचानक मला शोध लागला  भंडारदर्‍याच्या काजवा मोहोत्सवाचा. तेव्हापासून प्रत्येक वर्षी हा काजवा मोहोत्सव पहाण्यासाठी भंडारदर्‍याला जाणे होते.  वैशाखसरताना भंडारदर्‍याच्या हवेतच बदल होत नाही तर निसर्गही कात टाकतो. चोहोबाजूंना मिट्टकाळोख पसरलेला असतो आणि काजव्यांच्या प्रकाश शलाखा रस्त्यावरून, झाडांवरून खाली दरीतून डोंगरावरून लुकलुकत असतात. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागात अजूनही निसर्ग त्याच्या मूळ रूपात शाबूत आहे. ग्रीष्माच्या शेवटी आणि पावसाच्या सुरूवातीला इथल्या डोंगरदर्‍यांमद्धे काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. रस्त्याच्या दुतर्फा काही विशीष्ठ झाडांवरच काजव्यांचा लयबद्ध चमचमाट चालू असतो. ही काजव्यांची वाढती संख्या येणार्‍या पावसाची वर्दी देतात. त्यांच्या संखेवरून निसर्गत:च येणार्‍या पावसाच्या तीव्रतेची कल्पनाही करता येते. वातावरणातील दमटपणा आणि आद्रता जशी जशी वाढत जाते तशी तशी काजव्यांची संख्या वाढत जाते. जणूकाही सर्व नभोमंडळ जमीनीवर अवतीर्ण झाल्याचा स्वर्गीय अनुभव येतो.गाडीचे दिवे बंद करून फक्त यारस्त्यांवर मनसोक्त भटकायचे. या अग्निशिखा कधी तुमच्या डोक्यावरुन तर कधी आजुबाजुने स्वछंदपणे बागडत असतात. भान हरपून तुम्ही रात्रभर नुसते निशब्द फिरत असता आणी मनमुराद ही जमीनीवरची लोभसवाणी प्रकाशफुलं वेचत असता. हा अनुभव खरच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा स्वर्गीय आनंद प्रत्येकाने घ्यायलाच हवा. एकालयीत, तालासूरात निशब्द लुकलुकाट तुमच्या चोहोबाजूला चाललेला असतो, आपण त्याचे मुक साक्षीदार बनलेले असतो. गाडीचे दिवे उघडझाप करून पहा, हे काजव्यांचे दिवेही दिव्याच्या उघडझापीला त्यांच्या चमचमाटाने उत्तर देतात आणि तोही एका तालासुरात, फक्त तुम्हाला तो ताल-सुर कानाऐवजी तुमच्या नजरेने टिपता यायला हवा.अंधार्‍या रात्री गाडीचे दिवे बंद करून ऐकटेच या झगमगीत रस्त्यावरून रॉयल सफर करून बघा, तुम्ही कुणी स्पेशल असल्याचा अनुभव नक्कीच येणार. दुतर्फा नैसर्गिक दिव्यांचा झगमगाट आणी मधून आपली सवारी चालली आहे. एखाद्या परी कथेतील वर्णन ना!.. पण हे काजवे कॅमेर्‍यात बंदिस्त करणे हे महा कर्म कठीण काम. काजवा हा "आरथ्रोपोडी" समुदायातला कीटक आहे. सुमारे दोनशेच्या वरती जाती आहेत काजवयांच्या. प्रत्येकाचे रंग रूप वेगळे, प्रत्त्येकाच्या प्रकाशात फरक, कुणाचा कमी, तर कुणाचा जास्त. परंतु रंगात फरक जरी असला तरी हिरवट-पिवळसर प्रकाशाच्या छटाच तयार करतात हे काजवे. हा दमट वाटवरणात राहणारा जीव आहे, त्याची साधारण लांबी एक ते दीड सेंटीमेटर असते. काजव्यांच्या जीवनक्रम आणि फुलपाखराचा जीवनक्रम सारखाच, फक्त काजवे हे किटकभक्षी आहेत. आधी अंडी, मग त्यातून अळया बाहेर येतात आणी मग उडणारा झगमगणारा कीटक तयार होतो. काजव्यांच्या शरीरात मागील पोटाखालच्या भागात पारदर्शी आवरण असते, त्याला क्युटिकल म्हणतात. यातच प्रकाश देणारा घटक असतो. काजव्यांच्या प्रकाश देणार्‍या अवयवामध्ये / पेशींमध्ये "ल्युसिफेरीन" नावाचा घटक असतो. तोच त्यांच्या चमचमटाला कारणीभूत असतो. काजवयांचा प्रकाश हा थंड, शांत असतो. अंधार्‍यारात्री काजव्यांचे लुकलुकणे फारच मनमोहक दिसते. हे लुकलुकणे काजवयांच्या श्वासोछवासावर अवलंबून असते. जेव्हा कीटक श्वास सोडतो तेव्हा हा प्रकाश मंदावतो, पुन्हा श्वास घेताना प्रकाश प्रखर होतो. नर काजवा मादीपेक्षा थोडा प्रखर प्रकाश देतो, म्हणूनच मादी नराकडे आकृष्ट होते.त्यातून हे कीटक अंडी घालतात अन ती अंडी पाला पाचोळ्यात वर्षभर अळीच्या स्वरूपात राहतात आणि ह्या मौसम मध्ये त्यांच्या प्रजनांनातर त्यांचा कार्यकाळ संपतो.अशा ह्या मोहत्सवाची खरी सुरवात जी झाली ती पुरुषवाडी ह्या गावापासून पण थोडेसे आपिरिचित अन दळणवळणा चा अभाव त्या मुळे हा परिसर तसा पर्यटनाच्या दृष्टीने मागे पडला आणि पुढे आला भंडारदरा म्हणूनच ह्या वर्षी गेले दोन वर्षे करोनाच्या साथीने हा परिसर पर्यटनासाठी बंद असल्या कारणाने ह्या वर्षी काजवा महोत्सव पुरुषवाडी ला घेण्याचे ठरवले सुरवातीला दोन batch मध्ये म्हणजेच मे चा शेवटचा आठवडा आणि जून चा पहिला आठवडा अस नियोजन होत पण काही सदस्यांच्या सोयी मुळे मे मधेच दोन्ही batch घेण्याचे ठरले आणि पहिल्या batch ला पाहिजे तसे काजवे पाहण्यास नाही मिळाले म्हणून ती एक मनात खंत होतीच म्हणूनच दुसरी batch अगदी तीन दिवस अगोदर पर्यत पुरुषवाडी मध्ये कुठलीच कजव्यांची हालचाल न दिसल्याने ठिकाण बदलावं लागले आणि घाटघर च नियोजन केले परंतु तिथे होणारी शनिवार रविवार ची गर्दी पाहता रविवार आणि सोमवार च नियोजन ठरलं आणि तो निर्णय खरोखरच जेव्हा सदस्यांच्या डोळ्यांचे पारणे फीटताना दिसले तेव्हा मनाला एक आत्मिक समाधान झाले .असा ह्या प्रवासाचे वर्णन करावयाचे झाल्यास नेहमी प्रमाणे आमची 8 वाजता निघणारी बस 9 वाजता तिने प्रस्थान केले.गाडीने थोडे अंतर पार केल्या नंतर ग्रुप मध्ये बरीचशी मंडळी ही नवीन होती त्यामुळे त्यांची ओळख त्यांनी करून देताना एका वेगळ्या स्वरूपात करून देताना गाडीने रस्ता केव्हा पार केला ते कळलेच नाही त्यात रस्त्यात एका कार्यालयात जेवणासाठी थांबताना त्यांनी ज्या पद्धतीने आदरातिथ्य केले ते कधी विसरुचशकत नाही आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला तिथे पोहचल्यावर आमच्या घाटघर च्या भावाच्या हातून सर्व सदस्यांचे आपल्या पारंपरिक प्रथे प्रमाणे ग्रुप च्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.
नंतर चहाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्व धरणाच्या पाठीमागे जाऊन सर्वांनीच फोटोसेशन चा मनमुराद आनंद घेतला.
त्याच प्रमाणे सध्या आपण डोंगर दऱ्या फिरताना ओसाड झालेली रानमळे बघतो त्यांचे हे वैभव पुनः उभे करण्यासाठी आपल्या परीने जाऊ तिथे वृक्षारोपण ही संकल्पना ह्या वर्षी पासून आम्ही  चालू केली त्या नुसार वृक्षारोपण चा कार्यक्रम घेतला अन  जस जसा अंधार पडू लागला तस तशी
सर्वजण खूप खुश होत होते, सर्वाना काजवे कसे पाहावे काय काळजी घ्यावी या विषयी थोडे मार्गदर्शन करून आम्ही सर्वजण सृष्टीचा अनमोल नजरा बघण्यासाठी मार्गस्थ झालो काहीजण तर काजवे बघण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेत होते, लहान मुले पण त्यांना पकण्यासाठी त्याच्या मागे पळत होते थोड्यावेळाने एक काजवा एक जणांच्या हातावर येऊन बसला मग तो काही लहान मुलाच्या हातावर देऊन त्यांना काजवा त्याच्या हातावर पकडण्याचा अनुभव घेता आला, अर्थात ह्यात काजव्याची सुरक्षितता सांभाळली, आणि सर्वांना तो इवल्याशा जीवाला किती काळजीपूर्वक हाताळायला हवे हे सांगितले, लहान मुलांनी सुद्धा मग, अगदी प्रेमाने काजवा त्यांच्या हातावर चालताना त्याला इजा होणार नाही ह्याची काळजी घेतली.  ती खूप खुश होती सारखी कजव्याच्या मागे पळत होती, त्यांना काळोखात दुसरी कसलीच भीती वाटत नव्हती.  ती बिनधास्त पणे आनंद लुटत होती, त्याच्या पालकांना भीती वाटत होती, की काळोखाय पायाखाली एखादा, सरपटणार जीव येईल पण मुले बिनधास्त होती.खरच निसर्गाची काय किमया आहे ना, ना कोणती इलेक्ट्रिसिटी , ना कोणते लाईट कनेक्शन तरीही हे काजवे लुकलुकत होते, किती अवर्णनीय क्षण होते ते, अगदी दिवाळीत रोषणाई करतो तशी सर्व झाडे शृंगार केल्यासारखी लुकलुकत होती, त्या लुकलूकण्यामुळे त्या काळोखात त्याचे सौन्दर्य अगदी फुलून दिसत होते,  आम्हा सर्वांसाठी असे हजारो काजवे आसपास बघणे ही एक वेगळीच अनुभूती होती आणि हे सर्व क्षण डोळ्यात साठवून आम्ही जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.
आणि त्या नंतर कुणाच्या मोबाईल ला range नसल्यामुळे बिना म्युझिक चा सर्वांनीच गाण्याचा अनुभव घेतला आणि सर्वजण आपापल्या तंबू मध्ये जाऊन झोपली आणि सकाळची जी सुरवात झाली ती एक दुःखद घटना कळल्या मुळे ग्रुप मधील मंडन काका यांचे थोरले बंधु यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्या मुळे सर्वांनीच परिस्थिती चे भान ठेवून लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करून श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो.
काजव्यांचा  हा अविस्मरणीय अनुभव प्रत्येकानेच एकदा तरी अनुभवावा.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपूर.

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...